शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

काँग्रेसशी आघाडी आणि एमआयएमशी मैत्रीही : आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 2:14 AM

भारिप बहुजन महासंघ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहे. परंतु, एमआयएमशी मैत्री कायम राहील, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली.

उदगीर (जि़लातूर) : भारिप बहुजन महासंघ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहे. परंतु, एमआयएमशी मैत्री कायम राहील, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली.उदगीर येथे वंचित बहुजन विकास आघाडीची रविवारी दुष्काळ परिषद झाली. अ‍ॅड़ आंबेडकर म्हणाले, सत्ताधाऱ्यांना कुठल्याही निमित्ताने देशात दंगली घडवून आणायच्या आहेत़ मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांच्यात वाद निर्माण करायचा होता़ मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेने सरकारचा हेतू ओळखून जनता शांत राहिली. तेव्हा इतर प्रश्नांद्वारे देशात सवर्ण विरुद्ध इतर मागासवर्गीय यांच्यात भांडण लावून येणाºया लोकसभेच्या निवडणुकीत सत्ता संपादनाचा मार्ग सुकर करायचा सत्ताधाºयांचा डाव आहे. त्यासाठीच भाजपाने सुनियोजितपणे शिवसेनेला अयोध्येत पाठवून राम मंदिराच्या प्रश्नावर लोकांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला....तर सर्व जागा लढविणारकाँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्यास लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्याचा निर्धार असून लिंगायत समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. धनगर समाजाचा भ्रमनिरास झाल्यामुळे तो आता आमच्यासोबत या निवडणुकीत राहणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेस