शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सत्तेची किमया ! रिकाम्या खुर्च्यांनी त्रस्त काँग्रेसच्या स्थानिक कार्यक्रमांना वाढतेय गर्दी

By रवींद्र देशमुख | Published: March 09, 2020 11:12 AM

सत्तेचा फायदा काँग्रेसला कमकुवत झालेले संघटन मजबूत करण्यासाठी होणार आहे. ज्याची आवश्यकता शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक आहे. 

- रवींद्र देशमुख

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय आणि काँग्रेसची झालेली पिछेहाट यामुळे देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या संघटनाला मोठा धक्का बसला होता. सत्ता काळात काँग्रेसकडून देखील केडरवर दुर्लक्ष झालं होतच. त्यामुळे सत्ता जाताच काँग्रेसला घरघर लागली. महाराष्ट्रातूनही 2014 मध्ये काँग्रेसची सत्ता गेल्यामुळे काँग्रेसकडे कार्यकर्त्यांना वणवण भासली होती. मात्र 2019 मध्ये राज्यात सत्ता येताच काँग्रेसचे संघटन पुन्हा मजबूत होण्यास सुरुवात झाली आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी गर्दी जमत नसल्याने काँग्रेसनेते हैराण झाले होते. त्याचवेळी सत्ताधारी भाजप प्रचार सभांच्या गर्दीचा उच्चांक तयार करत होते. हा फरक सत्तेचा होता हे स्पष्टच होते. गर्दी जमत नसल्यामुळे भाजपकडूनही काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे अनेक काँग्रसनेते कार्यक्रम घेण्यास धजावत नव्हते. कार्यक्रम घेतला तरी निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर चित्र बदलताना दिसत आहे.

विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसनेते नाना पटोले यांचा नुकताच जालना शहरात जाहीर सत्कार करण्यात आला. येथील एका सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र हे सभागृह गर्दीने भरेल का, अशी शंका विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांनाच होती. खुद्द गोरंट्याल यांनीच तशी शंका उपस्थित होती. त्याचे कारण म्हणजे, निवडणूक प्रचारातील अनुभव त्यांना होता. मात्र जालना येथील सभागृह भरले होते. अर्थात ही सत्तेची किमया आहे, हे वेगळं सांगायला नको. मात्र या सत्तेचा फायदा काँग्रेसला कमकुवत झालेले संघटन मजबूत करण्यासाठी होणार आहे. ज्याची आवश्यकता शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक आहे.