शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची किमया ! रिकाम्या खुर्च्यांनी त्रस्त काँग्रेसच्या स्थानिक कार्यक्रमांना वाढतेय गर्दी

By रवींद्र देशमुख | Updated: March 9, 2020 11:14 IST

सत्तेचा फायदा काँग्रेसला कमकुवत झालेले संघटन मजबूत करण्यासाठी होणार आहे. ज्याची आवश्यकता शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक आहे. 

- रवींद्र देशमुख

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय आणि काँग्रेसची झालेली पिछेहाट यामुळे देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या संघटनाला मोठा धक्का बसला होता. सत्ता काळात काँग्रेसकडून देखील केडरवर दुर्लक्ष झालं होतच. त्यामुळे सत्ता जाताच काँग्रेसला घरघर लागली. महाराष्ट्रातूनही 2014 मध्ये काँग्रेसची सत्ता गेल्यामुळे काँग्रेसकडे कार्यकर्त्यांना वणवण भासली होती. मात्र 2019 मध्ये राज्यात सत्ता येताच काँग्रेसचे संघटन पुन्हा मजबूत होण्यास सुरुवात झाली आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी गर्दी जमत नसल्याने काँग्रेसनेते हैराण झाले होते. त्याचवेळी सत्ताधारी भाजप प्रचार सभांच्या गर्दीचा उच्चांक तयार करत होते. हा फरक सत्तेचा होता हे स्पष्टच होते. गर्दी जमत नसल्यामुळे भाजपकडूनही काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे अनेक काँग्रसनेते कार्यक्रम घेण्यास धजावत नव्हते. कार्यक्रम घेतला तरी निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर चित्र बदलताना दिसत आहे.

विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसनेते नाना पटोले यांचा नुकताच जालना शहरात जाहीर सत्कार करण्यात आला. येथील एका सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र हे सभागृह गर्दीने भरेल का, अशी शंका विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांनाच होती. खुद्द गोरंट्याल यांनीच तशी शंका उपस्थित होती. त्याचे कारण म्हणजे, निवडणूक प्रचारातील अनुभव त्यांना होता. मात्र जालना येथील सभागृह भरले होते. अर्थात ही सत्तेची किमया आहे, हे वेगळं सांगायला नको. मात्र या सत्तेचा फायदा काँग्रेसला कमकुवत झालेले संघटन मजबूत करण्यासाठी होणार आहे. ज्याची आवश्यकता शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक आहे.