शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

'जागावाटप राहू द्या, पुण्याकडे लक्ष द्या'; विरोधकांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 06:46 IST

'मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडले'

मुंबई : बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात अक्षरश: हाहाकार उडाला. अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले. ११ जणांचा बळी गेला असताना या पूरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिकीटवाटपाची चर्चा करायला दिल्लीला गेले, अशी टीका विरोधकांनी केली आहे.पुण्यातील पूरपरिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तिकीटवाटपाला उशीर झाला तरी चालेल. आधी पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यासह आसपासच्या परिसराची दैना झाली आहे. अनेक संसार रस्त्यावर आले आहेत. गायी-गुरे वाहून गेली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, सरकारी पातळीवर याबद्दल फारशी हालचाल दिसलेली नाही. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर तोफ डागली आहे. 'पुण्यात बिकट परिस्थिती आहे. मात्र, तेथील नागरिकांना दिलासा देण्याऐवजी, मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बसले आहेत. मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणुकांची काळजी आहे. जनतेबद्दल कळवळा नाही. पश्चिम महाराष्ट्रातील पुराच्या वेळीही मुख्यमंत्र्यांनी हेच केलं होतं,' असा आरोप त्यांनी केला आहे.विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. कोल्हापूर, सांगलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रेत होते आणि आता पुण्यात अशीच परिस्थिती निर्माण झालेली असताना मुख्यमंत्री दिल्लीत तिकीटवाटपावर चर्चा करताहेत. निवडणुकीपुढे या सरकारला जनेतच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना वाºयावर सोडून मुख्यमंत्री दिल्लीला गेले, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.राज्यातल्या जनतेनं या सरकारचं नेमकं काय घोडं मारलंय, हेच कळत नाही.-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेतेतिकीट वाटपाला उशीर झाला तरी चालेल. आधी पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या.-छगन भुजबळ, राष्ट्रवादी

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस