जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:54 IST2025-06-10T16:52:05+5:302025-06-10T16:54:05+5:30

CM Devendra Fadnavis: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

cm devendra fadnavis reaction over ncp sp group leader jayant patil told to sharad pawar for free me from all responsibility | जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

CM Devendra Fadnavis:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे दोन्ही गट त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. एकीकडे काका-पुतण्या एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच जयंत पाटील यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सर्व जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती शरद पवार यांना केली. याबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे. 

प्रदेशाध्यक्षपदाच्या सगळ्या जबाबदारीतून मला मुक्त करा. मला शरद पवार यांनी अनेकदा संधी दिली. आहेत. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुमच्या सर्वांसमोर शरद पवार यांना एवढीच विनंती करेन की, शेवटी हा पक्ष शरद पवारांचा आहे. त्यामुळे शरद पवार याबाबत निर्णय घेतील. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे. आजवर मिळालेल्या संधीसाठी शरद पवारांचे आभार मानतो आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही आभार मानतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

त्यांच्या मनात शिरुन ते जाणून घेऊन...

जयंत पाटील यांच्या मनात मला शिरावे लागेल. सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त करा म्हणाले, ते जबाबदारीतून मुक्त करणार हे माहिती असल्यामुळे म्हणाले की, त्यांच्या मनात दुसरे काही आहे, हे समजून घ्यावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यासंबंधी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर, ते एकत्रित येणार की नाही? हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या मनात शिरुन ते जाणून घेऊन तुमच्यापुढे ठेवण्याची माझ्याकडे शक्ती नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, मुंब्रा लोकल अपघातात १३ जण जखमी झाले आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आगामी काळात अशी घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात येऊ शकतो. मात्र खाजगी कार्यालयांमध्ये ते करणे थोडे कठीण आहे. कारण यामुळे कंपन्यांच्या नफा-तोट्यावर परिणाम होतो. मात्र आगामी काळात याबाबत निर्णय होऊ शकतो.

 

 

Web Title: cm devendra fadnavis reaction over ncp sp group leader jayant patil told to sharad pawar for free me from all responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.