शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
4
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
5
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
6
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
7
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
8
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
9
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
10
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
11
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
12
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
13
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
14
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
15
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
16
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
17
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
18
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
19
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
20
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
Daily Top 2Weekly Top 5

“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:18 IST

CM Devendra Fadnavis PC News: उद्धव ठाकरेंचे सरकार असताना काय झाले, याची आकडेवारीच मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केले.

CM Devendra Fadnavis PC News: शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन आमच्या सरकारने दिले आहे, ते आम्ही पूर्ण करणारच आहोत. पण आमचे माननीय उद्धव ठाकरे हे नेहमी त्यांनी कर्जमाफी केली, असे सांगत असतात. म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की, महात्मा ज्योतिबा फुले ही कर्जमाफी योजना त्यांनी घोषित केली होती. त्यावेळी त्यांनी २० हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. त्याच्या तीन वर्ष आधी आमच्याही सरकारने मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणली होती. त्यात १८ हजार ७६२ कोटी सुरुवातीला आणि नंतर १९०० कोटी अशी एकूण २० हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी तेव्हाही आम्ही केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काही वेगळे केले, असे काही नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकऱ्यांचे आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते. अशा स्थितीत पीक करपून गेले, पाण्याखाली गेले, जमीन खरडून गेल्याने पुन्हा पेरणीची स्थितीही उरली नाही. आर्थिक आणि मानसिक त्रास शेतकऱ्यांना झाला. त्याची शंभर टक्के भरपाई कुणीच देऊ शकत नाही परंतु शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी पॅकेज तयार केले आहे. ६८ लाख ६९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. २९ जिल्हे आणि २५३ तालुके सरसकट मदतीच्या पॅकेजमध्ये घेतले आहेत. जिथे पिकांचे नुकसान झाले तिथे अटी शिथिल करून मदत केली जाणार आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींची मदत जाहीर केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला. 

शेतकऱ्यांना आज थेट मदतीची जास्त गरज

याउलट उद्धव ठाकरे यांनी नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. परंतु, त्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी फुटकी कवडी दिली नाही. ती सगळी ज्या वेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा आम्ही ५ हजार कोटी रुपये हे त्यावेळेस दिले. मी हा आकडा याकरिता सांगतो की, आपण एक लक्षात ठेवा, २० हजार कोटी रुपयांची त्यांनी कर्जमाफी केली. आम्ही तर आत्ता जी नुकसानभरपाई देत आहोत, ती १८ हजार कोटी आहे. खरडून गेलेल्या जमिनींचा आकडा धरला तर तो २१ हजार कोटींच्या घरात जातो. त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही. पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण आत्ता कर्जमाफी केली, तरी तो आपल्या जमिनीसाठी माती कुठून आणणार? पुढील हंगामासाठी पैसे कुठून आणणार? म्हणून आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात कुठेही मागे हटलेलो नाही. तीही आम्ही करू. परंतु आज थेट मदत करणे, हे गरजेचे आहे. ती थेट मदत आम्ही राज्य सरकारच्या वतीने करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, आम्ही तिघांनी बसून या पॅकेजवर चर्चा केली. शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट असल्याने इतर ठिकाणचे चार पैसे कमी केली तरी शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलाचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी सीएसआर फंड काही जण द्यायला तयार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे दिले जातील. अजूनही काही मदतीची गरज असेल तिथे मदत करण्याची तयारी शासनाची आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer Loan Waiver Promise Will Be Fulfilled: CM Fadnavis Emphasizes Direct Aid

Web Summary : CM Fadnavis assured loan waivers will be fulfilled, highlighting the government's direct aid package of ₹31,628 crore for flood-affected farmers. He emphasized immediate financial assistance is more crucial than waivers for recovery, addressing concerns about land restoration and future cultivation costs.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरीMahayutiमहायुतीBJPभाजपा