शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भगवानगडावर ‘संघर्षा’चे ढग अधिक गडद !

By admin | Updated: October 10, 2016 06:22 IST

भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री आणि मंत्री पंकजा मुंडे हे दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने गडावर ‘संघर्षा’चे ढग अधिक गडद होताना दिसत

प्रताप नलावडे / बीडभगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री आणि मंत्री पंकजा मुंडे हे दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने गडावर ‘संघर्षा’चे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, संघर्ष टाळण्यासाठी त्यांच्याकडून ‘मध्यममार्ग’ काढला जातो का, या आशेवर भक्त आहेत. दसऱ्याला होणारा गडाचा वर्धापन दिन निर्विघ्नपणे पार पडावा, ही सर्वसामान्य भक्तांकडून अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे. संघर्षाचा तो क्षण येऊ नये, अशी प्रार्थना करत असल्याचे अनेक भक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रविवारी दिवसभर दोन्ही बाजूंच्या काही समर्थकांनी सोईस्कर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी पंकजा यांच्या भाषणासंदर्भात नामदेवशास्त्रींना अनेक पर्यायही सुचवले आहेत. त्यांचे कीर्तन झाल्यानंतर त्यांचे भाषण होईल, असा त्यातील एक प्रस्ताव आहे. नामदेवशास्त्री यांनी राजकीय भाषणाला विरोध केला आहे, परंतु त्यांचे भाषण हे राजकीय होणार नसून, सामाजिक असेल आणि त्या केवळ पाचच मिनिटे बोलतील, असाही एक दुसरा पर्याय त्यांनी सुचविला आहे. राजकीय एक शब्दही त्यांनी उच्चारला, तर आम्ही त्यांचे गुन्हेगार असू, परंतु केवळ भाषणाच्या मुद्द्यावरून शास्त्रींनी ताण वाढवू नये, असे केंद्रे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. महाराजांनी ‘बालहट्ट’ सोडून द्यावा, असेही ते म्हणाले. पंकजा यांचे काही समर्थक आणि स्वत: गोविंद केंद्रे हे दोन दिवसांपासून गडाच्या परिसरातील गावात फिरत असून, लोकांचा दसरा मेळाव्यातील भाषणाला विरोध नसल्याचे ते सांगत आहेत. दुसऱ्या बाजूला नामदेवशास्त्री यांनी राजकीय भाषणबाजीला या परिसरातील लोकांचाही विरोध असल्याचे सांगितले आहे.

दसरा मेळाव्याला जाण्यासाठीची तयारी जिल्ह्यात सुरू झाली असून, दसरा मेळाव्याचे स्टिकर असलेली वाहने रविवारी दिवसभर शहरातून फिरताना दिसत होती. गेली काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर सात ते आठ लाख भक्त राज्यभरातून गडावर येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पंकजा यांचाही अधिकृत शासकीय दौरा आला असून, मंगळवारी सकाळी ११ वाजता गोपीनाथगडावर जाऊन त्या तेथून हेलिकॉप्टरने थेट भगवानगडावर जाणार आहेत.