शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीचे वर्ग ९ आॅगस्टपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:48 IST

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी संपल्यानंतरही अद्याप ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असताना केंद्रीय प्रवेश समितीने येत्या ९ आॅगस्टपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश महाविद्यालयांना दिला आहे.

पुणे : अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी संपल्यानंतरही अद्याप ३० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असताना केंद्रीय प्रवेश समितीने येत्या ९ आॅगस्टपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश महाविद्यालयांना दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळू शकलेला नाही त्यांचे काय? त्यांचा अभ्यासक्रम मागे पडून शैक्षणिक नुकसान झाले याची जबाबदारी कुणाची? अशी विचारणा पालकांकडून करण्यात येत आहे.
तिसºया फेरीनंतरही अनेकांना अद्याप महाविद्यालय मिळू न शकल्याने विद्यार्थी व पालक चांगलेच धास्तावले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी समितीची आहे. मात्र, समितीने लगेच महाविद्यालय सुरू करण्याचा आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांचे ११ वीचे ७५ टक्के प्रवेश झाले आहेत, त्यांचे सत्र येत्या ९ आॅगस्टपासून सुरू करण्याचा आदेश समितीने दिला आहे.
सध्या चौथ्या फेरीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पसंतिक्रम बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत संधी देण्यात आली होती. केंद्रीय प्रवेशाच्या २९ हजार ५६०, तर कोट्यांतर्गत १५ हजार ४४ अशा एकूण ४१ हजार ८०६ जागा रिक्त आहेत. तर, ३० हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी ६ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.