शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

माझी जात वंजारी; नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 15:17 IST

हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी लढाई नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात सांगितले.

नागपूर: नागपूरात आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा घटनाबाह्य असल्याचे सांगत या कायद्या विरोध केला. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी करु नये अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा कायदा माझ्या जातीविरुद्ध असल्याचे सांगितले आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझी जात वंजारी आहे व नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध आहे. माझ्या जातीमधील 50 टक्के लोकं शेतमजुरी करतात. शेतमजुरी करत असताना शेतामध्येच त्यांचे बाळांपण होतं. त्यामुळे त्यांच्याकडे दाखले नाहीत. त्यामुळे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नसल्याने ते नागरिकत्व कोणत्या आधारे सिद्ध करणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

भारतामध्ये माझ्या जातीसारख्या सहा हजार जाती आहेत की ज्यांच्याकडे घर किंवा दाखले नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे ही लढाई गरीब जनता आणि श्रीमंत जनता अशी आहे. ही लढाई मलबार हिलमध्ये राहणारा माणूस आणि गडचिरोलीत राहणाऱ्या माणासांशी असून हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी लढाई नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात सांगितले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतातील राज्यांत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभरात पसरले असून, त्यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात कँटिन, वाचनालय व वर्गात शिरून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हैदराबाद, तामिळनाडू, लखनऊ, बंगळुरू, चेन्नई, मुंबई येथील विद्यार्थ्यांनी काल जोरदार निदर्शने करण्यात आली. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याविरोधात कोलकातामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार