शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

माझी जात वंजारी; नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 15:17 IST

हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी लढाई नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात सांगितले.

नागपूर: नागपूरात आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा घटनाबाह्य असल्याचे सांगत या कायद्या विरोध केला. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी करु नये अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा कायदा माझ्या जातीविरुद्ध असल्याचे सांगितले आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझी जात वंजारी आहे व नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध आहे. माझ्या जातीमधील 50 टक्के लोकं शेतमजुरी करतात. शेतमजुरी करत असताना शेतामध्येच त्यांचे बाळांपण होतं. त्यामुळे त्यांच्याकडे दाखले नाहीत. त्यामुळे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नसल्याने ते नागरिकत्व कोणत्या आधारे सिद्ध करणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

भारतामध्ये माझ्या जातीसारख्या सहा हजार जाती आहेत की ज्यांच्याकडे घर किंवा दाखले नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे ही लढाई गरीब जनता आणि श्रीमंत जनता अशी आहे. ही लढाई मलबार हिलमध्ये राहणारा माणूस आणि गडचिरोलीत राहणाऱ्या माणासांशी असून हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी लढाई नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात सांगितले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतातील राज्यांत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभरात पसरले असून, त्यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात कँटिन, वाचनालय व वर्गात शिरून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हैदराबाद, तामिळनाडू, लखनऊ, बंगळुरू, चेन्नई, मुंबई येथील विद्यार्थ्यांनी काल जोरदार निदर्शने करण्यात आली. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याविरोधात कोलकातामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार