शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

छगन भुजबळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:15 IST

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अत्यंत कमी दराने बाजारात कांद्याची विक्री सुरु आहे. सध्या कांद्याला 1600 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे. 

छगन भुजबळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर जुन्या अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा देखील समावेश आहे. 

छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला, त्यानंतर ते चांगलेच आक्रमक झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती की मी मंत्रिमंडळात असावं, मात्र मला कोणी डावललं याचा शोध घ्यावा लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच, आपण मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, त्याचे मला बक्षीस मिळाल्याचा टोला देखील छगन भुजबळ यांनी लगावला होता.

अशातच आता छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी कांद्यावर लावण्यात आलेले 20 टक्क्यांचे निर्यात शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे. महिनाभरातील लासलगाव बाजार समितीतील कांद्याच्या दरात चांगलीच चढ-उतार होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. 

महिनाभरात कांद्याच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे कांद्यावर लावण्यात आलेलं निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. सध्याचा लाल कांदा नाशवंत आहे, त्यामुळे त्याची लवकरात लवकर विक्री करणे गरजेचे आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या 60 टक्के कांदा उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रात होते. तर राज्याच्या एकूण कांदा उत्पादनापैकी 60 टक्के कांदा हा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

कांदा हे ऐकमेव नगदी आणि जिव्हाळ्याचे पीक आहे. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. लासलगाव ही अशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात इतर देशात कांद्याची निर्यात केली जाते. सध्या उन्हाळ कांद्याचे उत्पादन संपल्यामुळे लाल कांदा बाजारात येत आहे. मात्र, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अत्यंत कमी दराने बाजारात कांद्याची विक्री सुरु आहे. सध्या कांद्याला 1600 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे. 

आधीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसला आहे. अशातच आता उत्पादन खर्चापेक्षाही दर कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोट सहन करावा लागत आहे. नाशिकच्या कांद्याला परदेशात मोठी मागणी आहे. मात्र, सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावले आहे. त्याचा परिणाम थेट कांद्याच्या निर्यातीवर होत असल्याचे भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे. याचबरोबर, लाल कांदा टिकाऊ नसल्याने तात्काळ शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे सरकारने जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यात करावा, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, त्यासाठी निर्यातीवरील असणारे 20 टक्के निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी पत्रात केली आहे. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळonionकांदाNashikनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस