शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:26 IST

Raj Thackeray - Uddhav Thackeray, Vidhan Sabha Adhiveshan: हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यावरून दोन्ही ठाकरे बंधू याला मराठीचा, आपला विजय मानत आहेत. तर भाजपा उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना त्रिभाषा आयोगाचा अहवाल स्वीकारला होता, तो आपण रद्द केल्याचे सांगत आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे कामकाज सुरु झाल्याझाल्याच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. यामुळे विधानसभेत मोठा गोंधळ उडाला असून पटोले यांना निलंबित करण्यात आले आहे. अशातच विधानसभेबाहेर आणखी एक मुद्दा तापविला जात आहे, तो म्हणजे हिंदी भाषा सक्ती आणि राज-उद्धव ठाकरे एकत्र येणे. यावर राज ठाकरे यांचे एकेकाळचे आमदार राम कदम यांनी ठाकरेबंधुंच्या एकत्र येण्यावर भविष्यवाणी केली आहे. 

हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यावरून दोन्ही ठाकरे बंधू याला मराठीचा, आपला विजय मानत आहेत. तर भाजपा उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना त्रिभाषा आयोगाचा अहवाल स्वीकारला होता, तो आपण रद्द केल्याचे सांगत आहे. येत्या सहा तारखेला हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढणार होते. परंतू, प्रकरण तापण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर रदद् केला आहे. यावरून राम कदम यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या जुलमी निर्णयाला केराची टोपली दाखवली याचा गोष्टीचा जल्लोष करावा असा टोला कदम यांनी लगावला आहे. तसेच हिंदी सक्ती करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय होता. फडणवीस यांनी तो निर्णय रद्द केला, म्हणजे फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला आहे, असा युक्तीवाद कदम यांनी केला आहे. 

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरही राम कदम यांनी भविष्यवाणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसले तर ते राज ठाकरेंना आवडणार आहे का असा सवाल राम कदम यांनी केला आहे. झेंडे पाकिस्तानचे, भाषा काँग्रेसची अशी टीका करतानाच सावरकरांवर राहुल गांधी काही बोलले तर ते गप्प राहतात. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना सोडलेली ही उबाठा आहे. अशी ही उबाठा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोबत घेऊन जाणारी मनसे ही दोन्ही समीकरण राजकारणासाठी कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, असे राम कदम म्हणाले आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRam Kadamराम कदम