शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:26 IST

Raj Thackeray - Uddhav Thackeray, Vidhan Sabha Adhiveshan: हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यावरून दोन्ही ठाकरे बंधू याला मराठीचा, आपला विजय मानत आहेत. तर भाजपा उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना त्रिभाषा आयोगाचा अहवाल स्वीकारला होता, तो आपण रद्द केल्याचे सांगत आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे कामकाज सुरु झाल्याझाल्याच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. यामुळे विधानसभेत मोठा गोंधळ उडाला असून पटोले यांना निलंबित करण्यात आले आहे. अशातच विधानसभेबाहेर आणखी एक मुद्दा तापविला जात आहे, तो म्हणजे हिंदी भाषा सक्ती आणि राज-उद्धव ठाकरे एकत्र येणे. यावर राज ठाकरे यांचे एकेकाळचे आमदार राम कदम यांनी ठाकरेबंधुंच्या एकत्र येण्यावर भविष्यवाणी केली आहे. 

हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यावरून दोन्ही ठाकरे बंधू याला मराठीचा, आपला विजय मानत आहेत. तर भाजपा उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना त्रिभाषा आयोगाचा अहवाल स्वीकारला होता, तो आपण रद्द केल्याचे सांगत आहे. येत्या सहा तारखेला हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढणार होते. परंतू, प्रकरण तापण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर रदद् केला आहे. यावरून राम कदम यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या जुलमी निर्णयाला केराची टोपली दाखवली याचा गोष्टीचा जल्लोष करावा असा टोला कदम यांनी लगावला आहे. तसेच हिंदी सक्ती करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय होता. फडणवीस यांनी तो निर्णय रद्द केला, म्हणजे फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला आहे, असा युक्तीवाद कदम यांनी केला आहे. 

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरही राम कदम यांनी भविष्यवाणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसले तर ते राज ठाकरेंना आवडणार आहे का असा सवाल राम कदम यांनी केला आहे. झेंडे पाकिस्तानचे, भाषा काँग्रेसची अशी टीका करतानाच सावरकरांवर राहुल गांधी काही बोलले तर ते गप्प राहतात. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना सोडलेली ही उबाठा आहे. अशी ही उबाठा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोबत घेऊन जाणारी मनसे ही दोन्ही समीकरण राजकारणासाठी कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, असे राम कदम म्हणाले आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRam Kadamराम कदम