शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:26 IST

Raj Thackeray - Uddhav Thackeray, Vidhan Sabha Adhiveshan: हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यावरून दोन्ही ठाकरे बंधू याला मराठीचा, आपला विजय मानत आहेत. तर भाजपा उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना त्रिभाषा आयोगाचा अहवाल स्वीकारला होता, तो आपण रद्द केल्याचे सांगत आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे कामकाज सुरु झाल्याझाल्याच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. यामुळे विधानसभेत मोठा गोंधळ उडाला असून पटोले यांना निलंबित करण्यात आले आहे. अशातच विधानसभेबाहेर आणखी एक मुद्दा तापविला जात आहे, तो म्हणजे हिंदी भाषा सक्ती आणि राज-उद्धव ठाकरे एकत्र येणे. यावर राज ठाकरे यांचे एकेकाळचे आमदार राम कदम यांनी ठाकरेबंधुंच्या एकत्र येण्यावर भविष्यवाणी केली आहे. 

हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यावरून दोन्ही ठाकरे बंधू याला मराठीचा, आपला विजय मानत आहेत. तर भाजपा उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना त्रिभाषा आयोगाचा अहवाल स्वीकारला होता, तो आपण रद्द केल्याचे सांगत आहे. येत्या सहा तारखेला हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढणार होते. परंतू, प्रकरण तापण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर रदद् केला आहे. यावरून राम कदम यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या जुलमी निर्णयाला केराची टोपली दाखवली याचा गोष्टीचा जल्लोष करावा असा टोला कदम यांनी लगावला आहे. तसेच हिंदी सक्ती करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय होता. फडणवीस यांनी तो निर्णय रद्द केला, म्हणजे फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला आहे, असा युक्तीवाद कदम यांनी केला आहे. 

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरही राम कदम यांनी भविष्यवाणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसले तर ते राज ठाकरेंना आवडणार आहे का असा सवाल राम कदम यांनी केला आहे. झेंडे पाकिस्तानचे, भाषा काँग्रेसची अशी टीका करतानाच सावरकरांवर राहुल गांधी काही बोलले तर ते गप्प राहतात. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना सोडलेली ही उबाठा आहे. अशी ही उबाठा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोबत घेऊन जाणारी मनसे ही दोन्ही समीकरण राजकारणासाठी कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, असे राम कदम म्हणाले आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRam Kadamराम कदम