विद्यापीठ मान्यतेच्या नियमावलीत होणार बदल : डॉ. माणिकराव साळुंखे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 04:19 PM2020-01-15T16:19:08+5:302020-01-15T16:49:09+5:30

देशातील पारंपरिक विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे,अभिमत व खासगी आदी विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याचे काम सुरू...

Change in University accreditation rules: Dr. Manikrao Salunkhe | विद्यापीठ मान्यतेच्या नियमावलीत होणार बदल : डॉ. माणिकराव साळुंखे 

विद्यापीठ मान्यतेच्या नियमावलीत होणार बदल : डॉ. माणिकराव साळुंखे 

Next
ठळक मुद्देस्वतंत्र जनरल प्रसिद्ध करणार एकविसाव्या शतकातील विद्यापीठांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागणार माहिती तंत्रज्ञानामुळे पुढील काळात अनेक अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविले जाणार

राहुल शिंदे - 
पुणे : देशातील विद्यापीठांना मान्यता देण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने (एआययू) घेतला आहे. लवकरच या नियमांची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे जगभरातील उच्च शिक्षण क्षेत्रातील घडामोडींचे आणि नावीन्यपूर्ण संशोधनांचे लेखन प्रसिद्ध करण्यासाठी एआययूतर्फे स्वतंत्र जनरल प्रसिद्ध करणार आहे, असे एआययूचे अध्यक्ष डॉ. माणिकराव साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
देशातील पारंपरिक विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे,अभिमत व खासगी आदी विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याचे काम एआययूतर्फे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. बांगलादेश, भूतान, रिपब्लिक ऑफ कझाकीस्तान, मलेशिया, नेपाळ, थायलंड आदी देशातील १३ विद्यापीठे एआययूचे सहयोगी सदस्य आहेत. देशाच्या उच्च शिक्षणाला दिशा देण्यात एआययूची भूमिका महत्त्वाची आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात आणि झपाट्याने बदलणाऱ्या एकविसाव्या शतकातील विद्यापीठांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागणार आहे. त्यामुळेच एआययूने विद्यापीठांना मान्यता देण्याच्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
माणिकराव साळुंखे म्हणाले, माहिती तंत्रज्ञानामुळे पुढील काळात अनेक अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठांसाठी शेकडो एकर जागेची आवश्यकता भासणार नाही. 
त्यामुळे एआययूकडून विद्यापीठ मान्यतेच्या नियमावलीत बदल केले जाणार आहेत. 
साळुंखे म्हणाले, परदेशातून पदवी प्राप्त करून भारतात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीची समकक्षता एआययूकडून तपासून दिली जाते. त्याचप्रमाणे परदेशातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भारतात येऊन शिक्षण घ्यावे. या उद्देशाने केंद्र शासनाच्या सुचनेनुसार एआययूतर्फे ‘स्टडी इंडिया’हा उपक्रम राबविला जात आहे. इंटरनॅशनल ऑल युनिव्हर्सिटी स्तरावर एकविसाव्या शतकात विद्यापीठे कशी असावी? याबाबत विचारमंथन सुरू आहे. त्याचप्रमाणे येत्या २३ मार्च रोजी ‘रिइमॅजिंग इंडियन युनिव्हर्सिटी’ या विषयावर देशपातळीवरील परिषद घेतली जाणार आहे. तसेच खेलो इंडिया अंतर्गत १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाºया विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांच्या आयोजनात एआययूला सहभागी करून घेतले आहे. येत्या मार्च महिन्यात या स्पर्धा भुवनेश्वर येथे होणार आहेत.
शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण गोष्टींची व घडामोडींची माहिती माहिती व्हावी. या उद्देशाने एआययूतर्फे स्वतंत्र जर्नल प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यात प्रसिद्ध होणा लेखांची-शोधनिबंधांची गुणवत्ता तपासली जाईल, असे नमूद करून साळुंखे म्हणाले, एआययूचे संकेतस्थळावर जगभरातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे परदेशातील विद्यापीठांचे भारतातील विद्यापीठांशी करार करण्याचे काम सोपे होणार आहे. 
..........
कार्यपद्धतीत काही बदल करता येणार

एआयूममध्ये चार संशोधक विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यांना विविध संशोधन प्रकल्पांवर काम करावे लागेल. भारतात परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केल्यास काय होईल, आदी विषयावर हे विद्यार्थी काम करतील. त्यानुसार एआययूला आपल्या कार्यपद्धतीत काही बदल करता येतील, असेही माणिकराव साळुंखे यांनी सांगितले.

Web Title: Change in University accreditation rules: Dr. Manikrao Salunkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.