शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

ठाकरे सरकारचा कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारा : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 12:18 IST

महाविकास आघाडीच सरकार शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले असून, त्यांचे प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारे असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले.

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफीची यादी सोमवारी जाहीर केली आहे. त्यांनतर यावरून विरोधकांनी सरकारावर टीका केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारचा कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा म्हणत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पाटील म्हणाले, सप्टेंबर- अक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने 94 लाख हेक्टर क्षेत्राचा नुकसान केलं. उभ पिक डोळ्यासमोर गेलं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार प्रती हेक्टर तर फळबागांना 50 हजार प्रती हेक्टर नुकसानभरपाई मिळावी असे म्हणाले होते. आता ते सत्तेत आहे, मात्र अजूनही एक रुपयाची मदत मिळाली नाही. त्यामुळे यावरून लक्ष बाजूला नेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फसवी कर्जमाफीची घोषणा केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

तर या कर्जमाफीत शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही. आम्ही जी कर्जमाफी केली होती, त्यात 43 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 हजार कोटी रुपये प्रत्यक्षात जमा केले. याचा पुरावा म्हणजे या सरकारने 2015 नंतरची कर्जमाफी केली असून, त्यापूर्वीची कर्जमाफी आमच्या काळात झाली असल्याचं यातून स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.

तसेच ठाकरे सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते त्यांनी पाळले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीच सरकार शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले असून, त्यांचे प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारे असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले.