शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

“महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू”; मंत्री नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 14:24 IST

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारणा केली असता खळबळजनक माहिती समोर आली.

ठळक मुद्देजर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करूमंत्री नवाब मलिक यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडे कोणता पर्याय राहणार नाही.

मुंबई – राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचं समोर येत आहे. पुण्यात शुक्रवारी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केले. राज्यात अशी बिकट परिस्थिती असताना मंत्री नवाब मलिकांनी खळबळजनक दावा करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.( Central Government has asked them not to supply the medicine to Maharashtra Says Nawab Malik)

मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत म्हंटलय की, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

अशा धोकादायक परिस्थितीत रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडे कोणता पर्याय राहणार नाही. आपल्या देशात १६ निर्यातदारांकडून २० लाख कुपीचा वापर केला जातो.आता केंद्र सरकारकडून निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे ही औषधं देशात विकायला परवानगी मागितली असताना केंद्र सरकारने अद्याप त्यास नकार दिला आहे असं नवाब मलिकांनी सांगितले.

दरम्यान, उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडूनच ते विकले जावे असं सरकारचं म्हणणं आहे. या ७ उत्पादन करणाऱ्या कंपन्या जबाबदारी घेण्यात नकार देत आहेत. संकटकाळी निर्णय घेणं अपेक्षित असतं. औषधांची आवश्यकता असताना आणि उपलब्धता आहे फक्त निर्णय घेण्याची गरज आहे. या समस्येचं निराकरण करून राज्यातील सर्व हॉस्पिटलला औषधांचा पुरवठा केला पाहिजे असंही नवाब मलिक म्हणाले.   

भाजपानं आणला होता ५० हजार इंजेक्शनचा साठा

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. कोरोना साथ थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीयांना आवाहन केले होते. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी काही निर्यात करणाऱ्या औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा प्रा. लि. कंपनीशी चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपाकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती.

 

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकार