शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेला ब्रेक; अजित पवारांची भूमिका काय?

By यदू जोशी | Updated: May 6, 2023 08:45 IST

ईडी व सीबीआय कारवाई टाळण्यासाठी खेळलेली चाल, ही ठरली वावडीच

मुंबई - शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्या शक्यता व्यक्त केल्या जात होत्या त्या स्वत:च पदावर कायम राहण्याच्या त्यांच्या निर्णयाने संपुष्टात आल्या. तसेच राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेलाही ब्रेक लागला. पवार कुटुंबातील काहीजण ईडी, सीबीआयच्या रडारवर आहेत. अनिल देशमुख तुरुंगात गेले होते, नवाब मलिक तुरुंगात आहेत, हसन मुश्रीफ यांच्यावर कधीही मोठी कारवाई होऊ शकते. तपास यंत्रणांच्या कचाट्यातून पक्षाला सोडवायचे असल्याने पवार हे नंतरच्या पिढीला भाजपसोबत जाणे सोपे व्हावे म्हणून पदावरून दूर झाले आहेत, असेही विश्लेषक सांगत होते. मात्र तेही पवार यांनी खोटे ठरविले. 

राजकीय पंडितांची अनेक भाकिते फोलशरद पवार राजीनामा मागे घेणार नाहीत. ते त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवतील आणि राज्यात विरोधी पक्षनेते व त्यांचे पुतणे अजित पवार यांना सर्वाधिकार देतील, असे भाकीत केवळ माध्यमेच नव्हे तर अनेक राजकीय पक्षांचे नेतेही खासगीत वर्तवित होते. सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्याकडे अनुक्रमे केंद्र व राज्याची धुरा सोपविली की ते दोघे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतील व नव्या नेतृत्वाने निर्णय घेतला आहे, असे म्हणत शरद पवार कानावर हात ठेवतील, असा तर्कही राजकीय पंडित देत होते. पवार यांनी या सर्व शक्यतांना कात्रजचा घाट दाखवला आहे.

भाजपविरोधाची धार अधिक तीव्र करणार? १९७८ मध्ये पुलोदचा प्रयोग करताना जनसंघाला पवार यांनी मंत्रिमंडळात सामावून घेतले होते. हा अपवादवगळला तर पवार यांचे राजकारण हे भाजपविरोधीच राहिले आहे. आज भाजपसोबत जाण्याचा दबाव पक्षात असताना तसा निर्णय झालाच तर त्या निर्णय प्रक्रियेचा आपण भाग नव्हतो हे सांगण्यासाठी पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचीही जोरदार चर्चा होती. मात्र, भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरणाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता पवार हे भाजपविरोधाची धार अधिक तीव्र करतील असेच आजच्या निर्णयावरून दिसते.

भाजपच्या प्रयत्नांना खीळ? राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या संघर्षातून भाजपसोबत जाण्याचा निर्णय होईल, अशी आशा लावून असलेल्यांचीही तूर्त निराशा झाली आहे.पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिंदे यांना राज्यातून किमान ४२ जागा निवडून आणायच्या आहेत.अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी हा नवा मित्रपक्ष जोडण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न भाजपकडून केले जात होते. त्या प्रयत्नांनाही आता खीळ बसली आहे. 

अजित पवारांची भूमिका काय? पक्षातील सर्वच नेते शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून आर्जव करत असताना एकटे अजित पवार हे नवीन अध्यक्ष पक्षाला मिळाले तर काय बिघडले, अशी भूमिका घेत होते. मात्र ही भूमिका मान्य झाली नाही, स्वत: शरद पवार यांनीही ती मान्य केली नाही. आता अजित पवार कुठली पाऊले उचलतात याबाबत उत्सुकता असेल.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस