शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये बोनस, महाराष्ट्रात ठेंगा; कापूस उत्पादक शासकीय अनास्थेचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 18:33 IST

यंदाच्या खरिपात कीड व रोगांनी पोखरलेल्या कपाशीचा उत्पादनखर्च निघणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने हमीभावावर प्रतिक्विंटल 500 रूपये बोनस दिला.

गजानन मोहोडअमरावती : यंदाच्या खरिपात कीड व रोगांनी पोखरलेल्या कपाशीचा उत्पादनखर्च निघणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने हमीभावावर प्रतिक्विंटल 500 रूपये बोनस दिला. राज्यात मात्र तीन वर्षांपासून केवळ घोषणा होत आहेत. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचेच सरकार असताना महाराष्ट्रात उफराटा न्याय आहे. शासनाच्या अनास्थेमुळेच राज्यात कापूस उत्पादकांचा बळी जात असल्याचा आरोप होत आहे.कापूस उत्पादकाला दिलासा देण्यासाठी बोनस देण्याच्या घोषणा व आश्वासन राज्य शासनद्वारा गेल्या तीन वर्षांपासून देण्यात आले. प्रत्यक्षात कृती नाहीच, घोषणांची अंमलबजावणी झालीच नाही. या तीनही वर्षात नैसर्गिक आपत्तीमूळे कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. दिवाळीपूर्वी कापसाची खरेदी केंद्र सुरू होत नाहीत. त्यामुळे कापसाची थेट व्यापा-यांकडून बेभाव खरेदी व गुजरातला पाठवणी होते. मागील वर्षी साधारणपणे 4500 रुपये प्रतिक्विंटल दराने ‘राज्याचे लँकेशायर’ अशी ओळख असणा-या वºहाडाचे पांढरे सोने गुजरातमध्ये विकले गेले. यंदा तर व्यापा-यांची चांदीच आहे. 4320 हमीभाव व 500 रूपये बोनस असा 4820 भाव मिळणार आहे. त्यामुळे दस-यापूर्वीच व्यापा-यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला, तर पणन महासंघाच्या राज्यातील 60 केंद्रांना कापूस खरेदीच्या शुभारंभाला बोंडही मिळू शकले नाही. एकाधिकार मोडीत निघाल्यानंतर कापसाला अधिकाधिक भाव मिळेल, अशी अपेक्षा भाबडी ठरली. केवळ निवडणूक काळात कापूस उत्पादकाला बोनसचे गाजर दाखवायचे अन् गोंजारायचे, हाच फंडा गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. व-हाडातील प्रमुख पीक कापूस मातीमोल झाल्यानेच शेतकºयांच्या आत्महत्यांमध्येच ख-या अर्थाने वाढ झाली असल्याचे वास्तव आहे. सीसीआय गुजरातमध्येही कापूस खरेदी करते अन् महाराष्ट्रातही; तेथील राज्य सरकार कापूस उत्पादकांना बळ देण्यासाठी बोनस देत असताना, महाराष्ट्रात मतांसाठी केवळ भूलथापा दिल्या जात असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे.यंदाच्या खरीप हंगामात राज्यात साधारणपणे 48 लाख, विदर्भात 18 लाख व राज्यात ख-या अर्थाने कापूस उत्पादक असणा-या व-हाडात 11 लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पीक आहे. यंदा पेरणीपासूनच पावसाचा खंड असल्यामुळे शेतक-यांवर दुबार व तिबार पेरणीची वेळ आली. यामधून जी कपाशी वाचली, त्यावर लाल्याचा प्रादुर्भाव व आता गुलाबी अळीने बोंड पोखरल्या गेल्यामुळे कापसाची प्रतवारी खराब होत आहे. उत्पादनातही 50 टक्क्यांपेक्षा कमी येत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कापूस उत्पादकांना राजाश्रय देण्याची गरज निर्माण झाली आहे.शेतकरी वाचला तरच सरकार वाचेल-यंदा रेकार्डब्रेक क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली. मात्र, बीटी तंत्रज्ञान फेल झाल्यानेच उत्पादनाचा निचांक आहे. त्यातही उत्पादन खर्चावर हमीभाव नाहीत. त्यामुळे कापूस उत्पादकांना शासनाने बळ द्यावे. शेतकरी वाचला, तरच सरकार वाचणार आहे. एकही बोंड खासगी व्यापाºयांकडे विकले जाऊ नये, याची खबरदारी शासनाने घ्यावी. कापसाच्या दरावरून शेतक-यांची शासनावर प्रचंड नाराजी आहे. गुजरातमध्ये 5000रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असेल, तर महाराष्ट्रात का नाही? यावर राज्याचे मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गुजरातमध्ये निवडणूक असल्याने तेथील सरकार आश्वासनांची खैरात करीत आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक अडचणीत असताना शासनाची अनास्था आहे. राज्यातही भाजपाचाचे सरकार असताना शेतक-यांमध्ये भेदाभेद केला जात आहे. - विश्वासराव देशमुख, प्रगतिशील शेतकरी 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी