शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

शिवसेनेच्या 10 रुपयांत जेवणाच्या योजनेवर भाजपचा 'पंच' !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 6:07 PM

शेतकऱ्यांच्या मदतीव्यतिरिक्त सेनेने सर्वसामान्यांना केवळ 10 रुपयांत सकस आणि पोटभर जेवण देण्याची घोषणा केली. त्यासाठी प्रत्येक शहरात मध्यवर्थी स्वयंपाकगृहाची स्थापना करण्याचं वचनही सेनेच्या वतीने देण्यात आले.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे आता अवघे काही दिवसाच बाकी आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून सध्या आश्वासनांचा पाऊस पाडण्यात येत आहे. आघाडीकडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन मिळाले. त्यानंतर आता शिवसेना आणि भाजप देखील आश्वासनांसाठी मैदानात उतरली आहे.

विरोधकांनी आश्वासने दिल्यानंतर शिवसेनेने आपला स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध केला. त्यापाठोपाठ आता भाजपची शिवसेनेच्या वचनांना शह देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप एकत्र लढत असले तरी उभय पक्षांमधील जुगलबंदी मागील पाच वर्षांच्या कार्यकाळाप्रमाणेच सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यानंतर देशातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा झाले. त्याला शह देण्यासाठी शिवसेनेने आपल्या वचननाम्यात शेतकऱ्यांना वर्षाला 10 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली. शेतकरी मदतीच्या बाबती सेनेने भाजपला शह दिला आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीव्यतिरिक्त सेनेने सर्वसामान्यांना केवळ 10 रुपयांत सकस आणि पोटभर जेवण देण्याची घोषणा केली. त्यासाठी प्रत्येक शहरात मध्यवर्थी स्वयंपाकगृहाची स्थापना करण्याचं वचनही सेनेच्या वतीने देण्यात आले. याला शह देण्यासाठी भाजपने मागील पाच महिन्यापासून सुरू असलेली महाराष्ट्र अटल आहार योजनेच्या 5 रुपयांत पोटभर जेवण योजनेची व्याप्ती वाढविण्याचं ठरवलं आहे. एकूणच भाजपच्या सहा हजारांच्या मदतीवर सेनेचे 10 हजार रुपयांचा बाण मारला. तर सेनेच्या 10 रुपयांत पोटभर जेवणाच्या योजनेवर भाजपने अटल आहार योजनेतून 'पंच' लगावला आहे.