शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"भाजपचे एक मतही राष्ट्रवादी काँग्रेसला पडू देणार नाही", लातूरमध्ये महायुतीत कलह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 16:15 IST

Mahayuti Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या राज्य पातळीवरील नेत्यांकडून तिन्ही पक्षात समन्वय असल्याचे दावे केले जात आहेत. पण, वेगवेगळ्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर सुप्त संघर्ष होताना दिसत आहे.

BJP NCP Maharashtra Assembly election : महायुतीमध्ये सगळे काही आलबेल आहे, असे दावे राज्याच्या पातळीवरील नेते करत असले, तरी राज्याच्या वेगवेगळ्या भागांत तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. लातूरच्या भाजप जिल्हाध्यक्षांनी अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पक्षाचे एकही मत न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे इथे कलह निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्षांनी केलेल्या विधानामुळे स्थानिक पातळीवर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय करण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा अहमदपूरमधून गेल्यानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी हा इशारा दिला आहे. 

भाजप जिल्हाध्यक्ष देशमुख काय म्हणाले?

भाजपचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख म्हणाले की, "अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी काम केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही मत भाजपला पडले नाही. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा लोकसभेत पराभव झाला."

"राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मत पडू देणार नाही"

"अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणण्यात आला आहे. मात्र, निधी वाटपात भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलले गेले. भाजप म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांचे डोकं उठत होते. आता विधानसभेची निवडणूक आहे. भाजपचे एकही मत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांना पडणार नाही. आम्ही पडू देणार नाही", अशी भूमिका देशमुख यांनी जाहीर केली.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४PoliticsराजकारणMahayutiमहायुतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार