शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

Param Bir Singh: “उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 12:28 IST

Param Bir Singh: उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत असून, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजयश्री पाटील यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणीपरमबीर सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देशगृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची भाजप नेत्याची मागणी

मुंबई : परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली होती. यासंदर्भात परमबीर सिंग यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईउच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापले असून, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा भाजपकडून करण्यात आली आहे. (nitesh rane react on param bir singh case)

मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना या प्रकरणी CBI चौकशीचे आदेश दिले असून, १५ दिवसांत प्राथमिक चौकशी अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहे. त्यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

गृहमंत्र्यांनी शक्य तितक्या लवकर राजीनामा द्यावा

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो. गृहमंत्र्यांनी पदावर असताना CBI चौकशीला सामोरे जाता कामा नये. त्यामुळे त्यांनी शक्य तितक्या लवकर राजीनामा द्यावा. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात वसुली प्रकरणाचा उल्लेख केला होता, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी अवाक्षर काढले नाही

दुसऱ्या एका ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक अवाक्षरही काढले नाही की, कारवाई केली नाही. CBI ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या तक्रारीवर कोणतीच चौकशी का केली नाही, याचाही तपास केला पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी यावेळी केली आहे. 

Param Bir Singh: गृहमंत्री अनिल देशमुखांना HC चा दणका; १०० कोटी वसुलीच्या आरोपांची CBI चौकशी होणार!

दरम्यान, याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने सीबीआय संचालकांना १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले असून, यात कोणत्याही प्रकारे गुन्हा आढळत असेल, तर FIR दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.  

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालयAnil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Politicsराजकारण