शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

Param Bir Singh: “उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 12:28 IST

Param Bir Singh: उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत असून, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजयश्री पाटील यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणीपरमबीर सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देशगृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची भाजप नेत्याची मागणी

मुंबई : परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली होती. यासंदर्भात परमबीर सिंग यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईउच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापले असून, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा भाजपकडून करण्यात आली आहे. (nitesh rane react on param bir singh case)

मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना या प्रकरणी CBI चौकशीचे आदेश दिले असून, १५ दिवसांत प्राथमिक चौकशी अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहे. त्यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

गृहमंत्र्यांनी शक्य तितक्या लवकर राजीनामा द्यावा

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो. गृहमंत्र्यांनी पदावर असताना CBI चौकशीला सामोरे जाता कामा नये. त्यामुळे त्यांनी शक्य तितक्या लवकर राजीनामा द्यावा. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात वसुली प्रकरणाचा उल्लेख केला होता, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी अवाक्षर काढले नाही

दुसऱ्या एका ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक अवाक्षरही काढले नाही की, कारवाई केली नाही. CBI ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या तक्रारीवर कोणतीच चौकशी का केली नाही, याचाही तपास केला पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी यावेळी केली आहे. 

Param Bir Singh: गृहमंत्री अनिल देशमुखांना HC चा दणका; १०० कोटी वसुलीच्या आरोपांची CBI चौकशी होणार!

दरम्यान, याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने सीबीआय संचालकांना १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले असून, यात कोणत्याही प्रकारे गुन्हा आढळत असेल, तर FIR दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.  

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालयAnil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Politicsराजकारण