शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Nilesh Rane : "साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 11:26 IST

BJP Nilesh Rane And NCP Sharad Pawar : डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार होतील, असं भाकीत त्यांनी वर्तवल्याची माहिती आहे. यावरून भाजपाने निशाणा साधला आहे. 

मुंबई - एकनाथ शिंदे यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकांचे संकेत (Mid Term Elections) दिले असून नेत्यांनी तयार राहवे, अशा सूचनाही दिल्याचे समजते. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीसंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावरही, चर्चा झाली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होण्याचे संकेत पवारांनी दिले. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार होतील, असं भाकीत त्यांनी वर्तवल्याची माहिती आहे. यावरून भाजपाने निशाणा साधला आहे. 

"पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग?" असा खोचक सवाल भाजपानेशरद पवारांना (Sharad Pawar) विचारला आहे. भाजपाचे नेते निलेश राणे (BJP Nilesh N Rane) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग??" असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

शरद पवारांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणाता आता पुन्हा भूकंप होतो की काय, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, शिवसेनेतील शिंदे गटाने मोठा बंडाचा पवित्रा घेत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. विशेष म्हणजे सोमवारी या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. मात्र, तत्पूर्वीच शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याच्याशीच मिळते-जुळते विधान ट्विटरवरुन केले होते. 

 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ