शहरं
Join us  
Trending Stories
1
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
2
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
3
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
4
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
5
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
6
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
7
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
8
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
9
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
10
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
11
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
12
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
13
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
14
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
15
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
16
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
17
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
18
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
19
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
20
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!

शिवसेना उबाठा गट राष्ट्रवादीत विलीन करणार; भाजपा नेत्याने असा दावा का केला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 13:06 IST

उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेची किती मन की बात ऐकली का केवळ पाटणकरांच्या मन की बात ऐकली हे सांगावे असं नितेश राणेंनी म्हटलं.

मुंबई - येत्या १९ जून रोजी उद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उबाठा शिवसेना विलीन करण्याची घोषणा करणार आहेत. त्याबाबत बोलणी झालेली आहेत. विनायक राऊत शंभुराज देसाईंबाबत बोलले ते राऊतांना खरे वाटते. त्यात तथ्य वाटते. जर ते तथ्य असेल तर मी जी माहिती देतोय. उद्धव ठाकरे गट हे अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होतेय, याची घोषणा १९ जूनला उद्धव ठाकरे करणार आहेत हीदेखील तथ्य आहे असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. 

नितेश राणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी उद्धव ठाकरेंची आहे. संजय राऊतांनी २०० कोटी घेऊन महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला. आता राऊतांना उद्धव ठाकरेंची समजूत घालण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीत विलीन करा यासाठी १०० कोटींची ऑफर मिळाली आहे. तुमची आणि उद्धव ठाकरेंची महाराष्ट्राच्या राजकारणात किती लायकी राहिली त्यावर अग्रलेख लिहावा असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आहे. उबाठा गटाची स्थापना  १० ऑक्टोबर २०२२ ची आहे. उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव वापरण्याचा अधिकार नाही. ज्यांच्या हातात पक्ष नाही ते अधिकृत वर्धापन दिन कसा साजरा करू शकतात. शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिला आहे. उद्धव ठाकरेंचा मेळावा हा बेकायदेशीर आहे. स्वत: राजकीय लावारिस असलेल्यांनी दुसऱ्यांच्या आईवडिलांवर बोलू नये असंही नितेश राणेंनी टीका केली. 

भाजपा-शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवर फडकणार  भाजपाचा झेंडा हा हिंदुत्वाचा प्रतीक आहे, मराठी माणसाचा अभिमान आहे. या मराठी माणसाला तुम्ही मुंबईतून हद्दपार केले. मराठीचा टक्का बघा, तुमच्या दलालीमुळे हे झाले. उद्धव ठाकरे लंडनला गेलेत ते कोणाच्या पैशावर गेलेत? कार खरेदी करण्यासाठी, परदेश दौऱ्यासाठी व्यापारी चालतात. लंडनमधील हॉटेल आणि शॉपिंगचे बिल कोण देतेय? याचे नाव जाहीर करू का? मुंबई महापालिकेवर भाजपा-शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे. तो भगवाच आहे असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला. 

उद्धव-आदित्य ठाकरेंवर निशाणात्याचसोबत उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेची किती मन की बात ऐकली का केवळ पाटणकरांच्या मन की बात ऐकली हे सांगावे. महाराष्ट्र म्हणजे पाटणकर, पाटणकर म्हणजे महाराष्ट्र हेच घोषवाक्य उद्धव ठाकरेंचे होते. राज्यातील जितकी टेंडर वैभव चेंबरमध्ये बसून कोण ठरवायचे? पाटणकरांच्या दावणीला महाराष्ट्र बांधला त्यावरही बोलायला हवे. कायदा खोक्यांवर नाचतो असं विधान करतात. हे तुम्हीच करू शकतात. कारण आरेच्या गेस्ट हाऊसमध्ये कोण कुठे काय नाचत होते हे तुम्हाला बघण्याची सवय असल्याने सर्व गोष्टी खोक्यांवर दिसणार यात शंका नाही. मविआ सरकार असताना आदित्य ठाकरे रिझवी कॉलेजच्या मागे दिनो मोर्याचे घर आहे तिथे कोणाकोणाला नाचवायचा? याचीही माहिती दिली पाहिजे असंही नितेश राणेंनी म्हटलं. 

संजय राऊत दलाली करतातमोदी सरकारबद्दल संजय राऊतांनी आरोप केले. पण मोदी सरकारच्या कारभारामुळे दहशतवादी, भ्रष्टाचारी यांच्या नाकीनऊ आलेले आहे. २ हजार नोटांचे करायचे काय? याचा विचार करून ४ वेळा घरी डॉक्टर बोलवायला लागले आहेत. मोदी सरकारच्या ९ वर्षात देशाने जी प्रगती केली, दहशतवाद्यांना आळा बसला. भारताकडे वाकड्या नजरेने कुणी पाहू शकत नाही हे चित्र जगात आहे. ही परिस्थिती राजकीय दलालांना कधीच पाहवणार नाही. संजय राऊत कधी राष्ट्रवादी, कधी काँग्रेसची दलाली करतात. या देशाला मोदी सरकारने किती उंचीवर नेले हे तुम्हाला कळणार नाही. कोरोनानंतर देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढली. त्यात केवळ एकाच उद्योगपतीचा हात आहे त्यांनी एकाच पाटणकरांच्या हातात उद्धव ठाकरेंनी अख्खे मविआ सरकार दावणीला का बांधले होते. दिनो मोर्याचे लाड का पुरवले याचे उत्तर द्यावे असा इशारा संजय राऊतांना नितेश राणेंनी दिला. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेस