शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

शिवसेना उबाठा गट राष्ट्रवादीत विलीन करणार; भाजपा नेत्याने असा दावा का केला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 13:06 IST

उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेची किती मन की बात ऐकली का केवळ पाटणकरांच्या मन की बात ऐकली हे सांगावे असं नितेश राणेंनी म्हटलं.

मुंबई - येत्या १९ जून रोजी उद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उबाठा शिवसेना विलीन करण्याची घोषणा करणार आहेत. त्याबाबत बोलणी झालेली आहेत. विनायक राऊत शंभुराज देसाईंबाबत बोलले ते राऊतांना खरे वाटते. त्यात तथ्य वाटते. जर ते तथ्य असेल तर मी जी माहिती देतोय. उद्धव ठाकरे गट हे अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होतेय, याची घोषणा १९ जूनला उद्धव ठाकरे करणार आहेत हीदेखील तथ्य आहे असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. 

नितेश राणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी उद्धव ठाकरेंची आहे. संजय राऊतांनी २०० कोटी घेऊन महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला. आता राऊतांना उद्धव ठाकरेंची समजूत घालण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीत विलीन करा यासाठी १०० कोटींची ऑफर मिळाली आहे. तुमची आणि उद्धव ठाकरेंची महाराष्ट्राच्या राजकारणात किती लायकी राहिली त्यावर अग्रलेख लिहावा असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आहे. उबाठा गटाची स्थापना  १० ऑक्टोबर २०२२ ची आहे. उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव वापरण्याचा अधिकार नाही. ज्यांच्या हातात पक्ष नाही ते अधिकृत वर्धापन दिन कसा साजरा करू शकतात. शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिला आहे. उद्धव ठाकरेंचा मेळावा हा बेकायदेशीर आहे. स्वत: राजकीय लावारिस असलेल्यांनी दुसऱ्यांच्या आईवडिलांवर बोलू नये असंही नितेश राणेंनी टीका केली. 

भाजपा-शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवर फडकणार  भाजपाचा झेंडा हा हिंदुत्वाचा प्रतीक आहे, मराठी माणसाचा अभिमान आहे. या मराठी माणसाला तुम्ही मुंबईतून हद्दपार केले. मराठीचा टक्का बघा, तुमच्या दलालीमुळे हे झाले. उद्धव ठाकरे लंडनला गेलेत ते कोणाच्या पैशावर गेलेत? कार खरेदी करण्यासाठी, परदेश दौऱ्यासाठी व्यापारी चालतात. लंडनमधील हॉटेल आणि शॉपिंगचे बिल कोण देतेय? याचे नाव जाहीर करू का? मुंबई महापालिकेवर भाजपा-शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे. तो भगवाच आहे असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला. 

उद्धव-आदित्य ठाकरेंवर निशाणात्याचसोबत उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेची किती मन की बात ऐकली का केवळ पाटणकरांच्या मन की बात ऐकली हे सांगावे. महाराष्ट्र म्हणजे पाटणकर, पाटणकर म्हणजे महाराष्ट्र हेच घोषवाक्य उद्धव ठाकरेंचे होते. राज्यातील जितकी टेंडर वैभव चेंबरमध्ये बसून कोण ठरवायचे? पाटणकरांच्या दावणीला महाराष्ट्र बांधला त्यावरही बोलायला हवे. कायदा खोक्यांवर नाचतो असं विधान करतात. हे तुम्हीच करू शकतात. कारण आरेच्या गेस्ट हाऊसमध्ये कोण कुठे काय नाचत होते हे तुम्हाला बघण्याची सवय असल्याने सर्व गोष्टी खोक्यांवर दिसणार यात शंका नाही. मविआ सरकार असताना आदित्य ठाकरे रिझवी कॉलेजच्या मागे दिनो मोर्याचे घर आहे तिथे कोणाकोणाला नाचवायचा? याचीही माहिती दिली पाहिजे असंही नितेश राणेंनी म्हटलं. 

संजय राऊत दलाली करतातमोदी सरकारबद्दल संजय राऊतांनी आरोप केले. पण मोदी सरकारच्या कारभारामुळे दहशतवादी, भ्रष्टाचारी यांच्या नाकीनऊ आलेले आहे. २ हजार नोटांचे करायचे काय? याचा विचार करून ४ वेळा घरी डॉक्टर बोलवायला लागले आहेत. मोदी सरकारच्या ९ वर्षात देशाने जी प्रगती केली, दहशतवाद्यांना आळा बसला. भारताकडे वाकड्या नजरेने कुणी पाहू शकत नाही हे चित्र जगात आहे. ही परिस्थिती राजकीय दलालांना कधीच पाहवणार नाही. संजय राऊत कधी राष्ट्रवादी, कधी काँग्रेसची दलाली करतात. या देशाला मोदी सरकारने किती उंचीवर नेले हे तुम्हाला कळणार नाही. कोरोनानंतर देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढली. त्यात केवळ एकाच उद्योगपतीचा हात आहे त्यांनी एकाच पाटणकरांच्या हातात उद्धव ठाकरेंनी अख्खे मविआ सरकार दावणीला का बांधले होते. दिनो मोर्याचे लाड का पुरवले याचे उत्तर द्यावे असा इशारा संजय राऊतांना नितेश राणेंनी दिला. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेस