शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 8:53 PM

Param Bir Singh Letter: नारायण राणे (narayan rane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते.

ठळक मुद्देनारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणाराष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार - राणेराज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात - राणे

सिंधुदुर्ग :सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगणी करण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर व धक्कादायक आरोप केले आहे. यानंतर विद्यमान भाजप खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते. त्यानंतर आता नारायण राणे यांनी ठाकरे सरकारचे लवकरच विसर्जन होईल, असा दावा केला आहे. (bjp leader narayan rane claimed that thackeray govt will be dismissed soon)

नारायण राणे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध आणि लोकप्रिय उद्योपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकं, सचिन वाझे यांची अटक, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप यांसारख्या मुद्द्यांवरून नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

राष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. ही मागणी मान्य होणार असून, आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार आहे, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी केला आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी पुन्हा संसदेत करणार आहे, असेही राणे म्हणाले.

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पोलीस खात्यात कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सचिन वाझे हे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत होते, असा दावा करत वाझेंकडे अनेक वेगवेगळ्या गाड्या आढळल्या असतील, तर त्याच्या बाकीच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हायला हवी. अशा माणसाला पाठीशी घातले जाऊ नये, असे नारायण राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझेंना पाठीशी घातले

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे संबध असल्याचे बाहेर आल्यावर मनसुखची हत्या करण्यात आली. सचिन वाझेंनी ही हत्या केल्याचा आरोप मनसुखच्या पत्नीने केला तरी मुख्यमंत्र्यांनी त्याला पाठीशी घातले, अशी टीका नारायण राणे यांनी केली. मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांना अटक होऊ नये, म्हणून मुख्यमंत्रीनी प्रयत्न केले, असा आरोपही राणे यांनी केला. 

रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा

मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप होऊनही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देशमुख यांना वाचवण्यासाठी त्यांची बाजू घेतली. मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. कोणी निंदा, कोणी वंदा भ्रष्टाचार करणे हाच आमचा धंदा, असाच एकंदर या सरकारचा कारभार या सगळ्यातून दिसतो, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPresident Ruleराष्ट्रपती राजवटParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझेSharad Pawarशरद पवारMansukh Hirenमनसुख हिरणBJPभाजपा