शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत?; भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 21:07 IST

Param Bir Singh Letter and Sachin Vaze Case: आता ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणी भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणाठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत - भाजपचा सवालअनिल देशमुखांवरील आरोप गंभीर, हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केलंय - भाजप

मुंबई :सचिन वाझे (Sachin Vaze Case) प्रकरणानंतर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता, भाजप आणि अन्य पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारला जोरदार घेरले जात आहे. यानंतर आता ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे. (bjp leader madhav bhandari slams thackeray govt over sachin vaze and param bir singh letter issue)

ठाकरे सरकारची कार्यपद्धती या प्रकरणांवरून स्पष्ट झाली आहे. ज्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या कारणांखाली निलंबनाची कारवाई झाली आहे, अशा अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या आणि त्यांच्याकडून वाझेंकरवी जी कामे करून घेतली जात होती. ती कामे करून घ्या, अशी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती असल्याचे दिसते. सचिन वाझे यांच्यासारखे किती अधिकारी ठाकरे सरकारमध्ये दडले आहेत, अशी विचारण माधव भांडारी यांनी  केली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकावर टीका केली. तसेच सचिन वाझे, परमबीर सिंगांचे पत्र आणि अनिल देशमुख या मुद्यांवर यावेळी भाष्य केले.

सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

अनिल देशमुखांवरील आरोप गंभीर

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असला, तरी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितली आहे. परंतु, यावेळी अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. देशमुख यांना याचिकेत पक्षकार करून घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसे झाल्यास देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल, असा दावा भांडारी यांनी यावेळी केला आहे. 

लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या नेत्यांनी भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंगUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुखBJPभाजपा