शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत?; भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 21:07 IST

Param Bir Singh Letter and Sachin Vaze Case: आता ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणी भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणाठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत - भाजपचा सवालअनिल देशमुखांवरील आरोप गंभीर, हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केलंय - भाजप

मुंबई :सचिन वाझे (Sachin Vaze Case) प्रकरणानंतर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता, भाजप आणि अन्य पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारला जोरदार घेरले जात आहे. यानंतर आता ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे. (bjp leader madhav bhandari slams thackeray govt over sachin vaze and param bir singh letter issue)

ठाकरे सरकारची कार्यपद्धती या प्रकरणांवरून स्पष्ट झाली आहे. ज्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या कारणांखाली निलंबनाची कारवाई झाली आहे, अशा अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या आणि त्यांच्याकडून वाझेंकरवी जी कामे करून घेतली जात होती. ती कामे करून घ्या, अशी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती असल्याचे दिसते. सचिन वाझे यांच्यासारखे किती अधिकारी ठाकरे सरकारमध्ये दडले आहेत, अशी विचारण माधव भांडारी यांनी  केली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकावर टीका केली. तसेच सचिन वाझे, परमबीर सिंगांचे पत्र आणि अनिल देशमुख या मुद्यांवर यावेळी भाष्य केले.

सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

अनिल देशमुखांवरील आरोप गंभीर

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असला, तरी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितली आहे. परंतु, यावेळी अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. देशमुख यांना याचिकेत पक्षकार करून घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसे झाल्यास देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल, असा दावा भांडारी यांनी यावेळी केला आहे. 

लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या नेत्यांनी भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंगUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुखBJPभाजपा