शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

युती केली नसती तर सत्तेत आलो असतो; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 9:13 PM

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व पक्षांच्या कामगिरीची तुलना

मुंबई: आम्ही शिवसेनेसोबत विधानसभा निवडणूक लढलो. एकत्र प्रचारसभा घेतल्या. जनतेनं आम्हाला कौलदेखील दिला. मात्र शिवसेना थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्यानं राज्यात महायुतीचं सरकार येऊ शकलं नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं. निवडणूक निकालाच्या दिवसापासूनच शिवसेनेनं भाजपाला लांब ठेवायला सुरुवात केली. त्यामुळे शिवसेनेसोबत युती केली नसती, तर सत्तेत आलो असतो, असं आता आम्हाला वाटू लागल्याचंदेखील फडणवीस यांनी सांगितलं.आम्ही शिवसेनेसोबत लोकसभा निवडणूक लढवली. त्याचवेळी विधानसभेसाठीदेखील युती करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घडामोडी उलगडून सांगितल्या. लोकसभेत सोबत लढलो आणि विधानसभेसाठी वेगळे झालो, हे योग्य वाटणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकही शिवसेनेत सोबत लढा असा संदेश आम्हाला दिल्लीतून आला होता. त्यानुसार आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि जनतेनंदेखील आम्हाला कौल दिला. मात्र शिवसेनेनं जनादेशाचा विश्वासघात केला, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी 'एबीपी माझा' दिलेल्या मुलाखतीत केली. आम्ही २०१४ मध्ये १२३ जागा जिंकलो होतो. त्या तुलनेत यंदा आमच्या जागा कमी झाल्या. आम्हाला १०५ जागांवर यश मिळालं. मात्र आम्ही यावेळी १६४ जागाच लढवल्या होत्या हे लक्षात घ्या, असं म्हणत फडणवीसांनी इतर पक्षांनी जिंकलेल्या जागांची तुलना केली. आम्ही जितक्या जागा लढवल्या, त्यापैकी ६७ ते ७० टक्के जागा जिंकल्या. सध्या सत्तेत असलेल्या पक्षांचा स्ट्राईक रेट आमच्यापेक्षा खूप कमी आहे. त्यांनी फक्त बहुमताचं गणित जुळवलं आहे. त्यामुळे ते सत्तेत आहेत. राज्याची पहिली पसंती भाजपाला होती. त्यामुळे आमचा पराभव झाला आहे असं मी मानत नाही. सध्याची परिस्थिती पाहता, स्वबळावर निवडणूक लढवली असती तर सत्तेत आलो असतो असं वाटतं, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीचं आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींवर भाष्य केलं.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस