शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

अतिआत्मविश्वास भाजपाच्या अंगलट येईल, २०१९ जड जाईलः शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 2:42 PM

भाजपा आता ओव्हरकॉन्फिडन्ट झाली आहे.

मुंबई - एनडीएतून बाहेर पडण्याची तेलुगू देसमची भूमिका अपेक्षिक होती. आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील. भाजपाचे एनडीएतील कोणत्याही घटक पक्षाशी चांगले संबंध राहिले नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तेलुगू देसम पक्षाच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयानंतर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. तर दुसरीकडे, एनडीएच्या पूर्वीच्या नेत्यांनी आघाडी कायम राहावी म्हणून प्रयत्न केले होते. पण भाजपा आता ओव्हरकॉन्फिडन्ट झाली आहे, असं शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी म्हंटलं. 

आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तेलगू देसमचे मंत्री गुरुवारी (8 मार्च) राजीनामा देणार असल्याचं आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (7 मार्च) घोषणा केली होती. तेलुगू देसमच्या या निर्णयानंतर शिवसेनेने हे वक्तव्य केलं आहे. शिवसेनेला हे अपेक्षितच होतं. आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडले आहेत. घटक पक्षांशी भाजपाचे चांगले संबंध राहिलेले नाहीत.त्यामुळे हळूहळू उर्वरित घटक पक्षही बाहेर पडतील, असं संजय राऊत यांनी म्हंटलं. 

 

तेलुगू देसमच्या आधीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती. टीडीपीच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. भाजपाने आता तरी यावर विचार करावा. एनडीएच्या आधीच्या नेत्यांनी ही आघाडी कायम ठेवली होती. पण त्यांना आता अतिआत्मविश्वास आहे. २०१९ हे वर्ष भाजपासाठी खूप आव्हानात्मक असेल, असं प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी म्हंटलं आहे.