शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 16:53 IST

BJP Chandrashekhar Bawankule: अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले का, या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.

BJP Chandrashekhar Bawankule: लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ने भाजपाला फटकारले आहे. तर, मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत एक लेख प्रसिद्ध करण्यात आला. या लेखातूनही भाजप नेत्यांचे कान टोचण्यात आले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, अजित पवार यांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले का, या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.

ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपाच्या कामगिरीसह लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करताना महाराष्ट्रातल्या अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? अशी विचारणा या लेखातून करण्यात आली होती. पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यावरही प्रतिक्रिया विचारण्यात आली.

सुनेत्रा पवार यांना महायुतीचे समर्थन

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट यांचे नेते उपस्थित नव्हते. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुनेत्रा पवारांना दिलेली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. महायुतीमधून त्यांना सगळ्यांचे समर्थन आहे. महायुतीमधून हा नाही गेला, तो नाही गेला, याला काही अर्थ नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदीजींना पाठिंबा दिला होता . इतर निवडणुकीबाबत आमची त्यांची चर्चा बाकी आहे. चर्चा झाल्यावर यातून मार्ग निघेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, अजित पवारांना घेऊन भाजपाचे कोणतही नुकसान नाही. उलट २०१९ च्या तुलनेत भाजपाची मते वाढली. मात्र जागा कमी झाल्या हे सत्य आहे. महाविकास आघाडीतील लोक पराभूत झाल्यानंतर ईव्हीएमला दोष देतात. मात्र जिंकलेल्या जागा असतील, तिथे ईव्हीएमवर संशय का घेत नाहीत? असा प्रतिप्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस