शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 16:53 IST

BJP Chandrashekhar Bawankule: अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले का, या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.

BJP Chandrashekhar Bawankule: लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ने भाजपाला फटकारले आहे. तर, मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत एक लेख प्रसिद्ध करण्यात आला. या लेखातूनही भाजप नेत्यांचे कान टोचण्यात आले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, अजित पवार यांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले का, या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.

ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपाच्या कामगिरीसह लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करताना महाराष्ट्रातल्या अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? अशी विचारणा या लेखातून करण्यात आली होती. पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यावरही प्रतिक्रिया विचारण्यात आली.

सुनेत्रा पवार यांना महायुतीचे समर्थन

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट यांचे नेते उपस्थित नव्हते. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुनेत्रा पवारांना दिलेली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. महायुतीमधून त्यांना सगळ्यांचे समर्थन आहे. महायुतीमधून हा नाही गेला, तो नाही गेला, याला काही अर्थ नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदीजींना पाठिंबा दिला होता . इतर निवडणुकीबाबत आमची त्यांची चर्चा बाकी आहे. चर्चा झाल्यावर यातून मार्ग निघेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, अजित पवारांना घेऊन भाजपाचे कोणतही नुकसान नाही. उलट २०१९ च्या तुलनेत भाजपाची मते वाढली. मात्र जागा कमी झाल्या हे सत्य आहे. महाविकास आघाडीतील लोक पराभूत झाल्यानंतर ईव्हीएमला दोष देतात. मात्र जिंकलेल्या जागा असतील, तिथे ईव्हीएमवर संशय का घेत नाहीत? असा प्रतिप्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस