शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

"भाजपने शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला संपवलं"; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:57 IST

मुंबई दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषदत घेत महायुती सरकारवर टीकास्त्र डागलं.

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवारी संपली. महायुती, महाविकास आघाडीच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीत घटक पक्षांनी २८८ जागांवर आपले उमेदवार उभे केले असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्याआधी पत्रकार परिषद घेत रमेश चेन्नीथला यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला संपवल्याचा आरोप रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता प्रचाराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली. भाजपने शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला संपवत मित्र पक्षांच्या अनेक जागा काबीज केल्याचे रमेश चेन्नीथला म्हणाले. तसेच महायुती सरकारकडून महाराष्ट्राची लूट सुरु असून विधानसभा निवडणुकीत जनता याचा बदला घेईल असा इशाराही चेन्नीथला यांनी दिला आहे. यासोबत महाविकास आघाडीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असेही चेन्नीथला यांनी बजावले आहे. ज्या उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत त्यांनाच आम्ही 'एबी' फॉर्म दिले आहेत. ज्या काँग्रेस नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, असे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

"सर्व २८८ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जेव्हा तुम्ही महाविकास आघाडीची तुलना महायुतीशी करता तेव्हा आमच्या गटात कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीमध्ये मात्र वाद सुरू आहेत. महायुती आता संपली आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्षांना समान वागणूक दिली आहे. महायुतीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व जागा चोरल्या आहेत. यावरुन स्पष्ट होतंय की भाजपा आपल्या मित्रपक्षांना संपवत आहे. तर महाविकास आघाडीत आम्ही सर्व एकत्र आहोत," असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

"आम्ही समाजवादी पक्षाशी बोलत आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही या ध्येयाने काम करत आहोत. महाराष्ट्र सरकारची लाडली बेहन योजना निवडणूक आयोगाने बंद केली आहे कारण राज्य सरकारकडे पैसे नाहीत. महाराष्ट्रातील महिलांना सरकारकडून एकही पैसा मिळणार नाही. निवडणुकीपूर्वी खोटे बोलले गेले," असेही चेन्नीथला म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाcongressकाँग्रेस