शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेची कोंडी; काँग्रेस-राष्ट्रवादीचं पत्र नाहीच, राज्यपालांचाही वेळ वाढवण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 7:44 PM

काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेकडे पाठिंब्याचे पत्र दिल्याचे वृत्त असताना शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र निवडणूक 2019

मुंबई : काल संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास राज्यपालांचे पत्र मिळाले. आम्ही 24 तासांच्या आत दोन पक्षांसोबत चर्चा सुरू केली. आम्हाला 7.30 वाजेपर्यंतची मुदत होती. राज्यपालांना वेळ वाढवून देण्याची मागणी केली. मात्र राज्यपालांनी वेळ नाकारली आहे. वेळ नाकारली तरीही दावा नाकारलेला नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.  

काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेकडे पाठिंब्याचे पत्र दिल्याचे वृत्त असताना शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्याची मागणी करण्याचा सल्ला दिला होता. याबाबतचा संदेश त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला होता. त्याप्रमाणे शिवसेनेने राज्यपालांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपालांनी ही मागणी फेटाळली आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादीला दोन दिवस लागतील. पुढे काय असेल माहिती नाही. राष्ट्रपती राजवट लागेल की दुसऱ्या पक्षांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळेल. पण बहुमताचा आकडा घेऊन शिवसेना पुन्हा येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

या सगळ्या पार्श्वभुमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे किंवा राज्यपाल कोश्यारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सत्तास्थापनेचे निमंत्रण देतात याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. 

राज्यपालांच्या कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक जारी केले असून शिवसेनेचे नेते आपल्याला भेटले मात्र त्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले नाही. सरकार स्थापन करण्याच्या दाव्याचे पत्र दिले आहे. तसेच अन्य पक्षांच्या पाठिंब्याचे पत्र देण्यासाठी शिवसेनेने 3 दिवसांचा वेळ मागितला होता. तो नाकारण्यात आला आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस