शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

Unlock4: खूशखबर! उद्यापासून करू शकणार राज्यांतर्गत रेल्वे प्रवास; बुकिंग सुरू करण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 18:49 IST

Unlock4: केंद्र सरकारने ईपासची अट काढून टाकल्यानंतर सोमवारी राज्य सरकारनेही ई पास रद्द केला आहे. यामुळे खासगी वाहने, प्रवाशांना आता ई पास शिवाय राज्यात म्हणजेच आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे मध्य रेल्वेनेही याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई : राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची अट रद्द केल्याने आता रेल्वे खात्यानेही मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठी मध्य रेल्वेने उद्या, 2 सप्टेंबरपासून बुकिंगला सुरुवात केली आहे. हा रेल्वे प्रवास लॉकडाऊनपासून बंद करण्यात आला होता. यानंतर विशेष रेल्वेसेवा सुरु ठेवण्यात आली होती. 

केंद्र सरकारने ईपासची अट काढून टाकल्यानंतर सोमवारी राज्य सरकारनेही ई पास रद्द केला आहे. यामुळे खासगी वाहने, प्रवाशांना आता ई पास शिवाय राज्यात म्हणजेच आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे मध्य रेल्वेनेही याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. मध्ये रेल्वेने पत्रक काढत आरक्षण पद्धतीने उद्यापासून रेल्वेसेवा सुरु केली जाणार (Central Railway booking Start) असल्याचे म्हटले आहे. सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वेमधून हा प्रवास करता येणार आहे. प्रवासी ही रेल्वे तिकिटे रेल्वे स्थानकांवरून आरक्षित करू शकणार आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे.

म्हणजे नेमके काय?मध्ये रेल्वेने लॉकडाऊन काळात देशभरात जाण्यासाठी 16 अप आणि 16 डाऊन रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या. मात्र, महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवासबंदी असल्याने महाराष्ट्रातील या रेल्वे गाड्यांचा स्थानकांवरील थांबा (हॉल्ट) रद्द केला होता. आता ती पुन्हा सुरु केली जाणार आहेत. परराज्यात जाण्याऱ्या या रेल्वे गाड्यांमधून राज्यांतर्गत रेल्वेस्थानकांवर प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी 'लोकमत डॉट कॉम'ला माहिती दिली.

राज्यसरकारने सोमवारी लॉकडाऊन सुरु करताना आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी दिली आहे. राज्यात लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारने ई-पास (No E-pass required) रद्द केला आहे. आता राज्यात ई-पासशिवाय प्रवास करता येणार आहे.त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत.

 

काय बंद राहणार?

  • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था आणि क्लासेस बंदच राहणार आहेत. ऑनलाीन, डिस्टन्स लर्निंग सुरु राहणार आहे. 
  • सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम आदी स्थळे बंदच राहणार आहेत. 
  • एमएचएने परवानगी दिल्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंदी. 
  • मेट्रो सेवा बंदच राहणार आहे. 
  • सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम बंद राहणार आहेत. 

 

काय सुरु राहणार... 

  • सामान्य दुकाने, दारुची दुकाने सुरु राहणार आहेत. 
  • हॉटेल, लॉज 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
  • सरकारी कार्यालये त्यांना दिलेल्या क्षमतेनुसार सुरु ठेवायची आहेत..
  • खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी आहे, 
  • आंतरजिल्हा प्रवासासाठी आता परवानगी देण्यात आली असून कोणत्याही ई पासची गरज लागणार नाही. 
  • खासगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. 
  • टॅक्सी - 1+3 प्रवासी, रिक्षा - 1+2 प्रवासी, चारचाकी- 1+3 प्रवासी, दुचाकी- 1+1 हेल्मेट आणि मास्क परवानगी

 

मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार 

BSNL ची धांसू ऑफर; प्रीपेड रिचार्जवर 600 रुपयांपर्यतचा अतिरिक्त टॉकटाईम

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक