शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Unlock4: खूशखबर! उद्यापासून करू शकणार राज्यांतर्गत रेल्वे प्रवास; बुकिंग सुरू करण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 18:49 IST

Unlock4: केंद्र सरकारने ईपासची अट काढून टाकल्यानंतर सोमवारी राज्य सरकारनेही ई पास रद्द केला आहे. यामुळे खासगी वाहने, प्रवाशांना आता ई पास शिवाय राज्यात म्हणजेच आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे मध्य रेल्वेनेही याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई : राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची अट रद्द केल्याने आता रेल्वे खात्यानेही मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठी मध्य रेल्वेने उद्या, 2 सप्टेंबरपासून बुकिंगला सुरुवात केली आहे. हा रेल्वे प्रवास लॉकडाऊनपासून बंद करण्यात आला होता. यानंतर विशेष रेल्वेसेवा सुरु ठेवण्यात आली होती. 

केंद्र सरकारने ईपासची अट काढून टाकल्यानंतर सोमवारी राज्य सरकारनेही ई पास रद्द केला आहे. यामुळे खासगी वाहने, प्रवाशांना आता ई पास शिवाय राज्यात म्हणजेच आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे मध्य रेल्वेनेही याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. मध्ये रेल्वेने पत्रक काढत आरक्षण पद्धतीने उद्यापासून रेल्वेसेवा सुरु केली जाणार (Central Railway booking Start) असल्याचे म्हटले आहे. सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वेमधून हा प्रवास करता येणार आहे. प्रवासी ही रेल्वे तिकिटे रेल्वे स्थानकांवरून आरक्षित करू शकणार आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे.

म्हणजे नेमके काय?मध्ये रेल्वेने लॉकडाऊन काळात देशभरात जाण्यासाठी 16 अप आणि 16 डाऊन रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या. मात्र, महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवासबंदी असल्याने महाराष्ट्रातील या रेल्वे गाड्यांचा स्थानकांवरील थांबा (हॉल्ट) रद्द केला होता. आता ती पुन्हा सुरु केली जाणार आहेत. परराज्यात जाण्याऱ्या या रेल्वे गाड्यांमधून राज्यांतर्गत रेल्वेस्थानकांवर प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी 'लोकमत डॉट कॉम'ला माहिती दिली.

राज्यसरकारने सोमवारी लॉकडाऊन सुरु करताना आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी दिली आहे. राज्यात लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारने ई-पास (No E-pass required) रद्द केला आहे. आता राज्यात ई-पासशिवाय प्रवास करता येणार आहे.त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत.

 

काय बंद राहणार?

  • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था आणि क्लासेस बंदच राहणार आहेत. ऑनलाीन, डिस्टन्स लर्निंग सुरु राहणार आहे. 
  • सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम आदी स्थळे बंदच राहणार आहेत. 
  • एमएचएने परवानगी दिल्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंदी. 
  • मेट्रो सेवा बंदच राहणार आहे. 
  • सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम बंद राहणार आहेत. 

 

काय सुरु राहणार... 

  • सामान्य दुकाने, दारुची दुकाने सुरु राहणार आहेत. 
  • हॉटेल, लॉज 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
  • सरकारी कार्यालये त्यांना दिलेल्या क्षमतेनुसार सुरु ठेवायची आहेत..
  • खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी आहे, 
  • आंतरजिल्हा प्रवासासाठी आता परवानगी देण्यात आली असून कोणत्याही ई पासची गरज लागणार नाही. 
  • खासगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. 
  • टॅक्सी - 1+3 प्रवासी, रिक्षा - 1+2 प्रवासी, चारचाकी- 1+3 प्रवासी, दुचाकी- 1+1 हेल्मेट आणि मास्क परवानगी

 

मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार 

BSNL ची धांसू ऑफर; प्रीपेड रिचार्जवर 600 रुपयांपर्यतचा अतिरिक्त टॉकटाईम

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक