शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 10:00 IST

मुंबई बॉम्बस्फोट : १२ आरोपी १९ वर्षांनी निर्दोष 

मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी अवघ्या ११ मिनिटांत घडविलेल्या साखळी बॉम्बस्फोटांतील सर्व १२ आरोपींना विशेष न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. न्यायालयाने सर्वांची निर्दोष सुटका करत राज्य सरकार आणि तपास यंत्रणांना मोठा धक्का दिला. न्यायालयाने सर्व आरोपींची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.या बॉम्बस्फोटांत १८९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ८२७ जण जखमी झाले होते. विशेष मकोका न्यायालयाने २०१५ मध्ये १२ आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावली होती, तर सातजणांना जन्मठेप सुनावली होती. विशेष न्यायालयाने १३ आरोपींना दोषी ठरविले होते. मात्र, त्यातील एकाचा कोरोनामुळे कारागृहात मृत्यू झाला.विशेष न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले, तर पाच जणांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायालयाने राज्य सरकारचे अपील फेटाळले.

एकही गुन्हा झाला नाही सिद्ध प्रत्यक्षदर्शी, आरोपींचे कबुलीजबाब, त्यांच्याकडून हस्तगत केलेले साहित्य व घटनास्थळ यांचा आधार घेत खटला चालविण्यात आला होता. मात्र, या तिन्ही पातळ्यांवर एकही गुन्हा सिद्ध झाला नाही. त्यांच्यावरील गुन्हे सिद्ध करण्यास सरकारी वकील सपशेल अपयशी ठरले आहेत, असे निरीक्षण न्या. अनिल किलोर आणि न्या. श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने आरोपींची निर्दोष सुटका करताना नोंदविले.हा निकाल हे ‘आशेचे प्रतीक’काही आरोपींच्यावतीने ओडिशा हायकाेर्टाचे  निवृत्त मुख्य न्यायमूर्ती आणि आता वकिली करणारे एस. मुरलीधरन यांनी खंडपीठापुढे बाजू मांडली. निकाल दिल्यानंतर काही आरोपींचे वकील युग चौधरी न्यायालयाचे आभार मानताना म्हणाले की, गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलेल्या १० हून अधिक व्यक्तींना निर्दोष ठरवून त्यांची मुक्तता करणे, हे न्यायसंस्थेच्या कार्यक्षमतेचे श्रेय आहे. हा निकाल न्यायसंस्थेच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. या निर्णयामुळे केवळ न्यायसंस्थेवरील विश्वास नव्हे, तर माणुसकीवरील विश्वासही पुनर्स्थापित होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा निकाल ‘आशेचे प्रतीक’ म्हणून ओळखला जाईल.

निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार : मुख्यमंत्रीमुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सगळ्यांकरता हा निर्णय धक्कादायक आहे. मी अजून पूर्ण निकाल वाचलेला नाही. परंतु सरकारी वकीलांशी चर्चा केली आहे. या एका निकालाने कोणताही संदेश जाण्याचे कारण नाही. शेवटी भारतात मुक्त आणि निष्पक्ष न्याय होतो. आतंकवादी घटना करणाऱ्यांना आपल्या न्यायालयांनी फाशीची शिक्षाही दिलेली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निर्दोष सुटलेले आरोपीकमल अहमद मोहम्मद वकील अन्सारी (बिहार), मोहम्मद फैजल अंतुर रेहमान शेख (मुंबई), एहतेशाम कुतुबुद्दीन अन्सारी (ठाणे), नाविद हुस्सेन खान (सिंकदराबाद) आणि अशिफ खान बशीर खान (जळगाव) या पाचजणांना विशेष न्यायालयाने फाशी दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. कमल अहमद मोहम्मद वकील अन्सारी याचा २०२१ मध्ये कारागृहात मृत्यू झाला. त्याच्यासाठीही हा निकाल लागू होतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

तन्वीर अन्सारी, मोहम्मद माजीद मोहम्मद अन्सारी, शेख मोहम्मद अली आलम शेख, मोहम्मद साजिद मर्गुब अन्सारी, मुजम्मिल अंतुर रेहमान शेख, सुहेल मेहमुद शेख आणि जमीर अहमद लतीफर अरेहमान शेख या सातजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने त्यांचीही निर्दोष सुटका केली.

फसवे ‘क्लोजर’ नागरिकांचा विश्वास डळमळीत करतातएखाद्या गुन्ह्याच्या खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा देणे, हे गुन्हेगारी नियंत्रणासाठी, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक ठोस आणि आवश्यक पाऊल आहे.  मात्र, आरोपींना शिक्षा झाल्याचे भासवून एखादा गुन्हा उकलल्याचा आभास निर्माण करणे म्हणजे समाजाची दिशाभूल आहे. अशा प्रकारे फसवे ‘क्लोजर’ नागरिकांचा विश्वास डळमळीत करतात आणि समाजाला खोटा दिलासा मिळतो.  खरा धोका अजूनही अस्तित्वात आहे, असे न्यायालायने ६७१ पानी निकालपत्रात नमूद केले आहे. खंडपीठाने या अपिलांवर सहा महिने दैनंदिन सुनावणी घेतली. ३१ जानेवारीला सुनावणी पूर्ण केली आणि अपिलांवरील निकाल राखून ठेवला होता. त्यावर २१ जुलै राेजी निर्णय दिला.

आरोपींच्या डोळ्यात अश्रून्यायालयाने निकाल दिल्यानंतर नाशिक, अमरावती, पुणे, नागपूर येथील कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित असलेल्या काही आरोपींच्या डोळयात अश्रू आले, तर काहींच्या ओठावर हसू. निकाल लागताच आरोपींनी वकील आणि न्यायमूर्तींचेही आभार मानले.

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटMumbaiमुंबईBombsस्फोटकेMaharashtraमहाराष्ट्र