शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

भिशीलाही बसला लॉकडाऊनचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 04:41 IST

चिंता : दोन महिन्यांपासून कारभार ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका भिशी या प्रकारालाही बसला आहे. एका खासगी कंपनीकडून राज्याच्या विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या भिशी या गेल्या दोन महिन्यांपासून थंडावल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

श्रीराम चिट्स या नोंदणीकृत कंपनीतर्फे व्यापाऱ्यांचे विविध गट तयार करून त्यांच्यासाठी भिशी चालविली जाते. १ ते १५ लाख रुपयांपर्यंतच्या या भिशी असून, त्यासाठी व्यापाऱ्यांचे विविध गट तयार करून त्यांची जीएसटी विभागाकडे नोंदणी केली जाते. ही कंपनी १९७४ पासून काम करीत असून सध्या महाराष्टÑासह चार राज्यांमध्ये कंपनीचे काम सुरू आहे.

औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या शहरांसह राज्याच्या विविध शहरांमध्ये कंपनीची कार्यालये असून, तेथे भिशी चालविली जाते. पहिल्या महिन्याची रक्कम कंपनी स्वत:कडे ठेवून घेत असते. याशिवाय भिशी लागल्यावर प्रत्येकाकडून ५ टक्के रक्कम घेतली जाते. दर महिन्याच्या तिसºया शनिवारी लिलाव पद्धतीने भिशी काढली जाते. राज्यात मार्च महिन्यापर्यंत या कंपनीच्या भिशी व्यवस्थित सुरू होत्या. मात्र एप्रिलपासून या भिशी बंद पडल्या असून, त्याचे कारण लॉकडाउन असल्याचे सांगितले जाते. लॉकडाउनच्या काळात गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी या भिशी काढण्याला परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात येते.

लॉकडाउनच्या काळामध्ये जवळपास सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून, व्यापाºयांना पैशांची चणचण भासत आहे. त्यातच या भिशी योजनांमध्ये पैसा अडकलेला असताना दोन महिने भिशी काढली जात नसल्याने व्यापारी वर्ग चिंतेमध्ये पडला आहे. कंपनीच्या कार्यालयांमध्ये फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तेथे फोन उचलले जात नाहीत. कंपनीची हेल्पलाइनही तांत्रिक कारणामुळे बंद असल्याचा संदेश तेथे फोन केल्यावर मिळत आहे. कंपनीची काही कार्यालये बंद असल्याने याबाबत चौकशी कोठे करायची या संभ्रमामध्ये भिशीचे सदस्य पडले आहेत. या भिशींची जीएसटी विभागाकडे नोंदणी असली तरी गेले दोन महिने कोणतेही व्यवहारच झाले नसतील तर त्याबाबत या विभागाकडे काही कर भरण्याचा प्रश्नच येत नसल्याचे एका कर सल्लागाराने सांगितले. कंपनीकडे असलेला पैसा सुरक्षित आहे, मात्र लॉकडाउनच्या काळामध्ये भिशी काढण्यासाठी न मिळालेली परवानगी आणि कर्मचाºयांची कार्यालयातील कमी असलेली उपस्थिती यामुळे सध्या भिशी थांबलेली आहे. लवकरच ही भिशी पुन्हा पूर्ववत होईल, असे कंपनीमधील अधिकारी सांगत आहेत. अनेक ठिकाणी या कंपनीची कार्यालये रहिवासी क्षेत्रात असल्याने तेथील रहिवाशांकडून कार्यालय सुरू करण्यास विरोध होत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.औरंगाबाद : १५ वर्षांपासून कार्यरत. भिशीचे ४० ग्रुप आहेत.च्सोलापूर : १५ वर्षांपासून कार्यरत. भिशीचे २५ ग्रुप आहेत.च्सांगली : भिशीचे १६ ग्रुप आहेत. भिशीच्या प्रमाणात मालमत्ता, तारण ठेवलेली आहे.च्कोल्हापूर : १५ वर्षांपासून कार्यरत. भिशीचे ११ ग्रुप असून ५५० सभासद आहेत.कंपनीतर्फे जानेवारी ते मार्च महिन्यातील भिशीचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. लॉकडाऊन असल्याने सध्या लिलाव झालेले नाहीत. वसुलीचे काम सध्या सुरू आहे. मुंबई येथील कार्यालयाच्या सूचनेनंतर भिशीच्या व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.- विश्वनाथ मगदुम, शाखाधिकारी, श्रीराम चिट्स, कोल्हापूर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस