शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

...म्हणून शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेलो नाही! बाळासाहेब थोरातांनी सांगितला त्यांच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 14:24 IST

...यामुळे हा माझ्या राजकारणाचा टर्निक पॉइंट आहे. मी भाऊसाहेबांमुळे काँग्रेसमध्येच थांबलो आणि मला माझ्या पक्षानेही खूप संधी दिली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावे, असे आपल्या मनात चालले होते. तेव्हा महाराष्ट्रात एकंदर पवार साहेबांचीच हवा दिसत होती आणि पुढे आमदारकीच्या निवडणुकाही होत्या. मात्र, आपण भाऊसाहेबांमुळे पवारांसोबत राष्ट्रवादीत जाऊ शकलो नाही आणि काँग्रेसमध्येच थांबलो. हाच आपल्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट ठरला, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ते लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते. (Bhausaheb did not allow me to join NCP with Sharad Pawar, Congress leader Balasaheb Thorat stated the turning point of his politics)

थोरात म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 ला झाली. पवार साहेबांचे आणि माझे नाते जिव्हाळ्याचे होते. भाऊसाहेबांचे आणि माझे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. मी त्यांचा लाडका आमदार होतो. तेव्हा आमदारकीची निवडणूकही आली होती. भाऊसाहेब थोडे तात्विक विचाराचे होते. त्यांनी सांगितले, की तुला काँग्रेस पक्ष सोडता येणार नाही. तेव्हा मी म्हणालो होतो, की महाराष्ट्रात एकंदर पवार साहेबांचेच वातावरण दिसत आहे. पुढे आमदारकीची निवडणूक आहे. पण ते थोडे कम्यूनिस्ट टाइपचे होते. ते म्हणाले, म्हणजे तू काय आमदारकीसाठी राजकारण करतोय का? तत्वाचा विषय असतो, विचारांचा विषय असतो. तेव्हा त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि मी राष्ट्रवादीत न जाता काँग्रेसमध्येच थांबलो." 

शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...

यामुळे हा माझ्या राजकारणाचा टर्निक पॉइंट आहे. मी भाऊसाहेबांमुळे काँग्रेसमध्येच थांबलो आणि मला माझ्या पक्षानेही खूप संधी दिली. आजही जेव्हा मी शरद पवारांना भेटतो तेव्हा अनेक वेळा ते भाऊसाहेबांच्या आठवणी काढतात. आम्ही राजकीय दृष्ट्या जरी वेगळ्या मार्गाने गेलो असलो, तरी एकमेकांबद्दलचा आदर कधीही कमी झाला नाही, असेही थोरात यावेळी म्हणाले. 

यावेळी थोरातांनी, चित्रपटांवरही भाष्य केले. कंगना, रनवीर कपूर, ऋतिकचे सिनेमा त्यांना आवडतात, असे त्यांनी सांगितले. तसेच, कलाकृती म्हणून आपण सिनेमा पाहतो, असेही ते म्हणाले. 

...म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो -आपल्या शांत स्वभावासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो. यासाठी माझा शांत स्वभावही कारणीभूत असेल, कारण मी कुणाला, फारसा दुखावण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही. पण याचा तोटाही जास्त आहे याचा, कधी अशांतही झाले पाहिजे. ते होत नसावा हा तोटा आहे माझा. त्यामुळे तोटाही कधी होत असेल. कधी कधी लवकर गरम होणारे जे असतात, त्यांच्यासाठीही काही फायदे असतात काही तोटे असता. प्रत्येक स्वभावाचे काही फायदे काही तोटे आहेत."

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस