शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेलो नाही! बाळासाहेब थोरातांनी सांगितला त्यांच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 14:24 IST

...यामुळे हा माझ्या राजकारणाचा टर्निक पॉइंट आहे. मी भाऊसाहेबांमुळे काँग्रेसमध्येच थांबलो आणि मला माझ्या पक्षानेही खूप संधी दिली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावे, असे आपल्या मनात चालले होते. तेव्हा महाराष्ट्रात एकंदर पवार साहेबांचीच हवा दिसत होती आणि पुढे आमदारकीच्या निवडणुकाही होत्या. मात्र, आपण भाऊसाहेबांमुळे पवारांसोबत राष्ट्रवादीत जाऊ शकलो नाही आणि काँग्रेसमध्येच थांबलो. हाच आपल्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट ठरला, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ते लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते. (Bhausaheb did not allow me to join NCP with Sharad Pawar, Congress leader Balasaheb Thorat stated the turning point of his politics)

थोरात म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 ला झाली. पवार साहेबांचे आणि माझे नाते जिव्हाळ्याचे होते. भाऊसाहेबांचे आणि माझे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. मी त्यांचा लाडका आमदार होतो. तेव्हा आमदारकीची निवडणूकही आली होती. भाऊसाहेब थोडे तात्विक विचाराचे होते. त्यांनी सांगितले, की तुला काँग्रेस पक्ष सोडता येणार नाही. तेव्हा मी म्हणालो होतो, की महाराष्ट्रात एकंदर पवार साहेबांचेच वातावरण दिसत आहे. पुढे आमदारकीची निवडणूक आहे. पण ते थोडे कम्यूनिस्ट टाइपचे होते. ते म्हणाले, म्हणजे तू काय आमदारकीसाठी राजकारण करतोय का? तत्वाचा विषय असतो, विचारांचा विषय असतो. तेव्हा त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि मी राष्ट्रवादीत न जाता काँग्रेसमध्येच थांबलो." 

शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...

यामुळे हा माझ्या राजकारणाचा टर्निक पॉइंट आहे. मी भाऊसाहेबांमुळे काँग्रेसमध्येच थांबलो आणि मला माझ्या पक्षानेही खूप संधी दिली. आजही जेव्हा मी शरद पवारांना भेटतो तेव्हा अनेक वेळा ते भाऊसाहेबांच्या आठवणी काढतात. आम्ही राजकीय दृष्ट्या जरी वेगळ्या मार्गाने गेलो असलो, तरी एकमेकांबद्दलचा आदर कधीही कमी झाला नाही, असेही थोरात यावेळी म्हणाले. 

यावेळी थोरातांनी, चित्रपटांवरही भाष्य केले. कंगना, रनवीर कपूर, ऋतिकचे सिनेमा त्यांना आवडतात, असे त्यांनी सांगितले. तसेच, कलाकृती म्हणून आपण सिनेमा पाहतो, असेही ते म्हणाले. 

...म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो -आपल्या शांत स्वभावासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो. यासाठी माझा शांत स्वभावही कारणीभूत असेल, कारण मी कुणाला, फारसा दुखावण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही. पण याचा तोटाही जास्त आहे याचा, कधी अशांतही झाले पाहिजे. ते होत नसावा हा तोटा आहे माझा. त्यामुळे तोटाही कधी होत असेल. कधी कधी लवकर गरम होणारे जे असतात, त्यांच्यासाठीही काही फायदे असतात काही तोटे असता. प्रत्येक स्वभावाचे काही फायदे काही तोटे आहेत."

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस