शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

समतोल विकासासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही उपाय

By admin | Updated: December 31, 2014 01:04 IST

प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविताना केळकर समितीने शेतकऱ्यांची आजची दैनावस्था दूर करण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत.

नागपूर : प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविताना केळकर समितीने शेतकऱ्यांची आजची दैनावस्था दूर करण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत. डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांंवरील अहवाल नुकताच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केला. समितीने या अहवालात प्रादेशिक असमतोल दूर करण्यासंदर्भात विविध उपाययोजना सुचवितानाच मागास भागातील शेतकऱ्यांच्या दैनावस्थेकडेही लक्ष वेधले; तसेच ही अवस्था दूर करण्यासाठी काही उपायही सुचविले आहेत. त्यात प्रामुख्याने विदर्भातील कापूस उत्पादक, त्यांना मिळणारा मोबदला, त्यातून निर्माण होणारे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न आदींचा समावेश आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबीयांची वाताहत होत असल्याने त्यांच्या साक्षर मुलांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत विचार यात मांडण्यात आला आहे. नापिकीसाठी अपुरे सिंचन हे महत्त्वाचे कारण असल्याने किमान १० टक्के क्षेत्र तरी सिंचनाखाली यावे, पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी आगामी तीन वर्षांकरिता शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबास आर्थिक मदत, कृषिपंपांना तत्काळ वीजजोडणी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी हमीभाव आणि पीकहानीसाठी नुकसान भरपाई आदींकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.रोजगाराअभावी अनेक शिक्षित शेतकरी बेरोजगार आहेत. त्यांना स्वयंरोजगारासाठी कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठांमध्ये सध्या केवळ संशोधन व शिक्षण देण्याची प्रक्रिया चालते. या कार्यक्रमांना बी-बियाण्यांचे उत्पादन व विक्रीची जोड दिल्यास शेतकरी व विद्यापीठ यांच्यात खऱ्या अर्थाने दुवा साधला जाईल. कृषी विद्यापीठांशी निगडित विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे मतही समितीने व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)