शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

को जागर्ति?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 01:48 IST

अ.भा. साहित्य संमेलनाचे पडघम सुरू झाले आहेत. यंदा बहुधा येत्या फेब्रुवारी महिन्यात संमेलन डोंबिवलीत होत आहे. अध्यक्षपदासाठीही चुरस आहेच.

- रविप्रकाश कुलकर्णीअ.भा. साहित्य संमेलनाचे पडघम सुरू झाले आहेत. यंदा बहुधा येत्या फेब्रुवारी महिन्यात संमेलन डोंबिवलीत होत आहे. अध्यक्षपदासाठीही चुरस आहेच.सृष्टीचक्र अविरत फिरत असते. सुष्ट आणि दुष्ट ही लढाई विषम आहे; पण याचा अर्थ दुष्टांचा नि:पात होणारच नाही असं नाही. ती उमेद कायम टिकवण्यासाठी सण-उत्सवांची निर्मिती झाली आहे. शेवटी हजार वर्षांचा काळोखदेखील एका काडीच्या प्रकाशाने नष्ट होतो. या काडीचं भान ठेवणं यासाठीच म्हणायचं, ‘को जागर्ति?’ याचा अर्थ ‘कोण जागं आहे?’ आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे हे लक्ष्मी पाहत असते. ते काय फक्त कोजागरीपुरतंच आहे?धर्म, जाती-जमाती-उपजाती यांचं प्रस्थ कमी कमी होत गेलं पाहिजे असं वाटत असतानाच वारे उलटेच वाहत आहेत असं वाटण्यासारखी परिस्थिती झाली आहे. साहेबराव ठाणगे यांनी म्हटलंय, पाऊस असा कोसळावाधर्म जाती जाव्यात बुडूनपाऊस असा गडगडावा मधल्या भिंती जाव्यात पडूनएका कवीचं हे आकं्रदन कुणाच्या कानावर जाणार आहे की नाही?म्हणून मग म्हणावंसं वाटतं, को जागर्ति?अ.भा. साहित्य संमेलनाचे पडघम सुरू झाले आहेत. यंदा बहुधा येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात संमेलन डोंबिवली येथे होत आहे. या वेळी सात-आठ ठिकाणांहून आपल्या गावी संमेलन व्हावं अशी मागणी आली होती. डोंबिवलीकरांनी आपल्या गावी हे संमेलन व्हावे म्हणून आठ वर्षे पाठपुरावा केला होता. आता इतर जण असा पाठपुरावा करतील काय? त्यांच्या या संमेलन प्रेमाला दाद द्यायलाच हवी. पण क्षणभर त्यांनी असा विचार करावा की, त्यांच्याकडे साहित्य संमेलन झालं असतं तर त्यांची कशी तयारी केली असती? त्यांचा ब्ल्यू प्रिंट त्यांनी तयार करायला काय हरकत आहे? त्या दृष्टीकोनातून ते डोंबिवली संमेलन आयोजकांना सूचना करू शकतील का?मागे बहुधा कौतिकराव ढाले पाटील हे जाहीरपणे म्हणाले होते की, साहित्य संमेलनाचं संमेलनाध्यक्षपद हवं आहे तर आम्हाला भेटा. ही कार्यप्रणाली त्यांनी एकदा जाहीरच करून टाकावी की, म्हणजे एकदाच हे अ.भा. अध्यक्षपद काय आहे याचे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल... पण हे व्हायला कोणाला हवं का?म्हणून म्हणतो, को जागर्ति?आता साहित्य संमेलन म्हटलं की संमेलनाध्यक्ष आलाच, त्याची साठमारी आता सुरू होईलच. आता निवडणूक म्हटलं की ते अपरिहार्यच... पण, साहित्य संमेलनाध्यक्ष तरी कशाला व्हायचं? जयवंत दळवी म्हणत की, मला काही खरोखरच सांगायचं असेल तर मी लेख लिहीन, पुस्तक लिहीन! त्यासाठी संमेलनाध्यक्षच व्हायला पाहिजे असं थोडंच आहे? पण जयवंत दळवींना असल्या गोष्टींचा सोसच नव्हता. त्यांचं जाऊ दे, पण ज्यांना मान हवा आहे, कौतुक करून घ्यायचं आहे, मिरवायचं पण आहे त्यांना शौक करू देत. पण संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर उगाच कुठली भूमिका घेण्यात काय अर्थ आहे. यावरून आठवलं, संमेलनाध्यक्षपद संमेलनाला नसलं तरी कुणाचं काहीही अडत नाही. जसं व्हायचं तसं संमेलन होतं हे आपण पाहिलं आहे. कुणी सांगावं उद्या एखादा संमेलनाध्यक्ष भाषण हवंच कशाला? असं म्हणेलदेखील. संमेलनाने असे अनेक प्रश्न आजतागायत मांडले आहेत. त्यांचं काय करायचं? त्यांचं काय झालं. त्या अर्थानं मग म्हणायचं, ‘को जागर्ति?’ हे सगळं पाहता मग मराठी भाषा मरू घातली आहे, असं कुणी म्हणतात त्याचं काय? पुस्तक कोणी वाचत नाही असा वर्षानुवर्षे गळा काढला जातो आहे. पण, इकडे पाहावं तर प्रकाशकांची जशी संख्या वाढते आहे त्याचप्रमाणे साहित्य संमेलनात विक्रमी संख्येने पुस्तकं विकली जातात असं दर साहित्य संमेलनात सांगितलं जातंय. मग हा तिढा कसा सोडवायचा?अशा वेळी प्रश्न येतोच, ‘को जागर्ति?’संमेलनाच्या निमित्ताने का होईना चार ठिकाणची चार लोकं येतात. साहित्याच्या वातावरणात कमी-जास्त राहतात. हे चांगलंच आहे. पण हे वातावरण थोडंसं तरी टिकण्यासाठी स्थानिक संमेलन आयोजक काही करतात का? करू शकतात का? संमेलनाचा खर्च आता ४-५ कोटींच्या घरात जायला लागला आहे. दरवर्षी तो वाढतोच आहे. हे पैसे उभारताना आयोजकांना काय काय यातायात करावी लागते हे त्यांचं त्यांनाच ठाऊक, पण प्रत्यक्षात साहित्यासाठी, वाङ्मयीन वातावरण उभारण्यासाठी, टिकविण्यासाठी असं म्हणता येईल. अशा उपक्रमांना कितीसा पैसा जातो? संमेलन मंडप आणि जेवणावळी हाच सर्वांत मोठा खर्च होतो? म्हणूनच काही म्हणतात, साहित्य रसिकांची बडदास्त उत्तम ठेवा म्हणजे जेवण उत्तम द्या. राहायची व्यवस्था चोख करा. म्हणजे संमेलन झालं यशस्वी. याचं उत्तर काय आहे? म्हणून म्हणतो, ‘को जागर्ति?’ हे सगळं का सांगतो आहे ते सांगतो. काल कोजागरी होती. परंपरेनं आलेल्या गोष्टी सांगून झाल्या.आटीव दूध पिणं झालं. जागरणपण केलं. पण नातवानं प्रश्न केला, टी.व्ही. सिरीयल पाहता पाहता आता जागरण होतंच ना? तरी का म्हणायचं, ‘को जागर्ति?’ त्याची समजूत कशीबशी मी घातली. पण खरंच ‘को जागर्ति?’ काय फक्त कोजागरीलाच?