शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

को जागर्ति?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 01:48 IST

अ.भा. साहित्य संमेलनाचे पडघम सुरू झाले आहेत. यंदा बहुधा येत्या फेब्रुवारी महिन्यात संमेलन डोंबिवलीत होत आहे. अध्यक्षपदासाठीही चुरस आहेच.

- रविप्रकाश कुलकर्णीअ.भा. साहित्य संमेलनाचे पडघम सुरू झाले आहेत. यंदा बहुधा येत्या फेब्रुवारी महिन्यात संमेलन डोंबिवलीत होत आहे. अध्यक्षपदासाठीही चुरस आहेच.सृष्टीचक्र अविरत फिरत असते. सुष्ट आणि दुष्ट ही लढाई विषम आहे; पण याचा अर्थ दुष्टांचा नि:पात होणारच नाही असं नाही. ती उमेद कायम टिकवण्यासाठी सण-उत्सवांची निर्मिती झाली आहे. शेवटी हजार वर्षांचा काळोखदेखील एका काडीच्या प्रकाशाने नष्ट होतो. या काडीचं भान ठेवणं यासाठीच म्हणायचं, ‘को जागर्ति?’ याचा अर्थ ‘कोण जागं आहे?’ आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे हे लक्ष्मी पाहत असते. ते काय फक्त कोजागरीपुरतंच आहे?धर्म, जाती-जमाती-उपजाती यांचं प्रस्थ कमी कमी होत गेलं पाहिजे असं वाटत असतानाच वारे उलटेच वाहत आहेत असं वाटण्यासारखी परिस्थिती झाली आहे. साहेबराव ठाणगे यांनी म्हटलंय, पाऊस असा कोसळावाधर्म जाती जाव्यात बुडूनपाऊस असा गडगडावा मधल्या भिंती जाव्यात पडूनएका कवीचं हे आकं्रदन कुणाच्या कानावर जाणार आहे की नाही?म्हणून मग म्हणावंसं वाटतं, को जागर्ति?अ.भा. साहित्य संमेलनाचे पडघम सुरू झाले आहेत. यंदा बहुधा येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात संमेलन डोंबिवली येथे होत आहे. या वेळी सात-आठ ठिकाणांहून आपल्या गावी संमेलन व्हावं अशी मागणी आली होती. डोंबिवलीकरांनी आपल्या गावी हे संमेलन व्हावे म्हणून आठ वर्षे पाठपुरावा केला होता. आता इतर जण असा पाठपुरावा करतील काय? त्यांच्या या संमेलन प्रेमाला दाद द्यायलाच हवी. पण क्षणभर त्यांनी असा विचार करावा की, त्यांच्याकडे साहित्य संमेलन झालं असतं तर त्यांची कशी तयारी केली असती? त्यांचा ब्ल्यू प्रिंट त्यांनी तयार करायला काय हरकत आहे? त्या दृष्टीकोनातून ते डोंबिवली संमेलन आयोजकांना सूचना करू शकतील का?मागे बहुधा कौतिकराव ढाले पाटील हे जाहीरपणे म्हणाले होते की, साहित्य संमेलनाचं संमेलनाध्यक्षपद हवं आहे तर आम्हाला भेटा. ही कार्यप्रणाली त्यांनी एकदा जाहीरच करून टाकावी की, म्हणजे एकदाच हे अ.भा. अध्यक्षपद काय आहे याचे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल... पण हे व्हायला कोणाला हवं का?म्हणून म्हणतो, को जागर्ति?आता साहित्य संमेलन म्हटलं की संमेलनाध्यक्ष आलाच, त्याची साठमारी आता सुरू होईलच. आता निवडणूक म्हटलं की ते अपरिहार्यच... पण, साहित्य संमेलनाध्यक्ष तरी कशाला व्हायचं? जयवंत दळवी म्हणत की, मला काही खरोखरच सांगायचं असेल तर मी लेख लिहीन, पुस्तक लिहीन! त्यासाठी संमेलनाध्यक्षच व्हायला पाहिजे असं थोडंच आहे? पण जयवंत दळवींना असल्या गोष्टींचा सोसच नव्हता. त्यांचं जाऊ दे, पण ज्यांना मान हवा आहे, कौतुक करून घ्यायचं आहे, मिरवायचं पण आहे त्यांना शौक करू देत. पण संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर उगाच कुठली भूमिका घेण्यात काय अर्थ आहे. यावरून आठवलं, संमेलनाध्यक्षपद संमेलनाला नसलं तरी कुणाचं काहीही अडत नाही. जसं व्हायचं तसं संमेलन होतं हे आपण पाहिलं आहे. कुणी सांगावं उद्या एखादा संमेलनाध्यक्ष भाषण हवंच कशाला? असं म्हणेलदेखील. संमेलनाने असे अनेक प्रश्न आजतागायत मांडले आहेत. त्यांचं काय करायचं? त्यांचं काय झालं. त्या अर्थानं मग म्हणायचं, ‘को जागर्ति?’ हे सगळं पाहता मग मराठी भाषा मरू घातली आहे, असं कुणी म्हणतात त्याचं काय? पुस्तक कोणी वाचत नाही असा वर्षानुवर्षे गळा काढला जातो आहे. पण, इकडे पाहावं तर प्रकाशकांची जशी संख्या वाढते आहे त्याचप्रमाणे साहित्य संमेलनात विक्रमी संख्येने पुस्तकं विकली जातात असं दर साहित्य संमेलनात सांगितलं जातंय. मग हा तिढा कसा सोडवायचा?अशा वेळी प्रश्न येतोच, ‘को जागर्ति?’संमेलनाच्या निमित्ताने का होईना चार ठिकाणची चार लोकं येतात. साहित्याच्या वातावरणात कमी-जास्त राहतात. हे चांगलंच आहे. पण हे वातावरण थोडंसं तरी टिकण्यासाठी स्थानिक संमेलन आयोजक काही करतात का? करू शकतात का? संमेलनाचा खर्च आता ४-५ कोटींच्या घरात जायला लागला आहे. दरवर्षी तो वाढतोच आहे. हे पैसे उभारताना आयोजकांना काय काय यातायात करावी लागते हे त्यांचं त्यांनाच ठाऊक, पण प्रत्यक्षात साहित्यासाठी, वाङ्मयीन वातावरण उभारण्यासाठी, टिकविण्यासाठी असं म्हणता येईल. अशा उपक्रमांना कितीसा पैसा जातो? संमेलन मंडप आणि जेवणावळी हाच सर्वांत मोठा खर्च होतो? म्हणूनच काही म्हणतात, साहित्य रसिकांची बडदास्त उत्तम ठेवा म्हणजे जेवण उत्तम द्या. राहायची व्यवस्था चोख करा. म्हणजे संमेलन झालं यशस्वी. याचं उत्तर काय आहे? म्हणून म्हणतो, ‘को जागर्ति?’ हे सगळं का सांगतो आहे ते सांगतो. काल कोजागरी होती. परंपरेनं आलेल्या गोष्टी सांगून झाल्या.आटीव दूध पिणं झालं. जागरणपण केलं. पण नातवानं प्रश्न केला, टी.व्ही. सिरीयल पाहता पाहता आता जागरण होतंच ना? तरी का म्हणायचं, ‘को जागर्ति?’ त्याची समजूत कशीबशी मी घातली. पण खरंच ‘को जागर्ति?’ काय फक्त कोजागरीलाच?