शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

वेध विधानसभा निवडणुकीचे! आजपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 07:00 IST

Vidhan Sabha Election 2019: शिवसेना-भाजपा युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं गणित अद्यापही जुळालेलं दिसत नाही.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज किंवा उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवामुळे राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. गुरूवारी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पडलं. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांना लागले आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुका साधारणपणे 15-20 ऑक्टोबरच्या दरम्यान पार पडतील. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल असं बोललं जात होतं. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 14 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत असल्याने त्याआधीच निवडणुकीची घोषणा करण्यात येईल असंही सांगितलं जात आहे.

शिवसेना-भाजपा युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं गणित अद्यापही जुळालेलं दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यभरात महाजनादेश यात्रा काढली जात आहे तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. 14 सप्टेंबरपासून या यात्रांचा तिसरा टप्पा सुरू होईल. तर आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाकडून विविध विकासकामांच्या उद्धाटनांचा धडाका लावण्यात आला आहे. 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली यात युतीबाबत आणि जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबत चर्चादेखील केली अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. मंगळवारी रात्री झालेल्या या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. जवळपास एक तास मुख्यमंत्री मातोश्री होते. जागावाटप आणि आगामी निवडणुकीची रणनीती या चर्चेत ठरवण्यात आली. युतीतील जागावाटपाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुचविलेला फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाकरे यांना सांगितला.

तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची दिल्लीत भेटही झाली आहे. राज्यातील दोन्ही पक्षातील नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यात दोन्ही पक्ष प्रत्येकी 106 जागा लढवेल तर उर्वरित जागा मित्रपक्षांना देईल असं ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, मनसे यांच्या भूमिका अद्याप स्पष्ट झाल्या नाहीत तर एमआयएमने वंचितशी फारकत घेत 3 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेElectionनिवडणूक