शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वेध विधानसभा निवडणुकीचे! आजपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 07:00 IST

Vidhan Sabha Election 2019: शिवसेना-भाजपा युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं गणित अद्यापही जुळालेलं दिसत नाही.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज किंवा उद्यापासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवामुळे राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. गुरूवारी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पडलं. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांना लागले आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुका साधारणपणे 15-20 ऑक्टोबरच्या दरम्यान पार पडतील. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल असं बोललं जात होतं. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 14 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत असल्याने त्याआधीच निवडणुकीची घोषणा करण्यात येईल असंही सांगितलं जात आहे.

शिवसेना-भाजपा युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं गणित अद्यापही जुळालेलं दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यभरात महाजनादेश यात्रा काढली जात आहे तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. 14 सप्टेंबरपासून या यात्रांचा तिसरा टप्पा सुरू होईल. तर आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाकडून विविध विकासकामांच्या उद्धाटनांचा धडाका लावण्यात आला आहे. 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली यात युतीबाबत आणि जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबत चर्चादेखील केली अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. मंगळवारी रात्री झालेल्या या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. जवळपास एक तास मुख्यमंत्री मातोश्री होते. जागावाटप आणि आगामी निवडणुकीची रणनीती या चर्चेत ठरवण्यात आली. युतीतील जागावाटपाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुचविलेला फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाकरे यांना सांगितला.

तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची दिल्लीत भेटही झाली आहे. राज्यातील दोन्ही पक्षातील नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यात दोन्ही पक्ष प्रत्येकी 106 जागा लढवेल तर उर्वरित जागा मित्रपक्षांना देईल असं ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, मनसे यांच्या भूमिका अद्याप स्पष्ट झाल्या नाहीत तर एमआयएमने वंचितशी फारकत घेत 3 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेElectionनिवडणूक