शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही- अशोक चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 06:47 IST

गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोट येथे केले

अकोट (अकोला) : गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोट येथे केले. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान स्थानिक खरेदी-विक्री मैदानात सभा पार पडली. त्यावेळी चव्हाण बोलत होते.अशोक चव्हाण म्हणाले, की केंद्रात व राज्यात भाजप-सेनेचे सरकार आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. जनतेची फसवणूक केली. या सरकारला शेतकरी, युवक, व्यापारी सर्वच कंटाळले आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापन करणार, सहा महिन्यांनंतर आपलेच सरकार येईल.भाजपा सरकारने शेतकऱ्यांना मदत तर केली नाहीच; परंतु जीएसटीचा कायदाही शेतकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरला आहे. व्यापाºयांना वर्षात ३६ रिटर्न भरावे लागत आहेत. राज्यात हे सरकार आल्यापासून ११ हजारांच्यावर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, तर देशात ५० हजारांच्यावर हा आकडा गेला आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.नागपूरकर मुख्यमंत्र्यांचे पश्चिम विदर्भाकडे दुर्लक्षएकेकाळी अकोला जिल्ह्याची ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळख होती. मात्र, सध्या या जिल्ह्यातील सुतगिरण्या बंद पडल्या असून, नवीन उद्योग सुरू करण्यात आले नाहीत. पश्चिम विदर्भाकडे नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळापूर येथे केला. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेंतर्गत आयोजित सभेत बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, केंद्र सरकारला राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उत्तर देता येत नसल्याने त्यांनी तत्काळ सीबीआय संचालकांना हटविण्याची घाई केली. यातच भ्रष्टाचार दडला असून, ‘न खाउंगा, ना खाने दुंगा’ची भाषा आता बदलत आहे. २०१४ मध्ये दिलेले अच्छे दिन, नोटबंदी, जीएसटी, शेतकºयांच्या मालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासनांपैकी कुठलेही आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही असे ते म्हणाले.सरकारी संस्थांमध्ये वाढता हस्तक्षेपईडी, सीबीआय यासारख्या सरकारी संस्थांमध्ये सरकारचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे. या संस्थांचा वापर करून सरकार विरोधी पक्षांना वेठीस धरीत आहे. हा एकप्रकारचा ‘कर्करोग’च आहे. हा कर्करोग तुमच्या आमच्यासह सर्वांना गिळंकृत करेल, असेही अशोक चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९