शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 21:01 IST

मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्या बैठकमराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणारसंभाजीराजे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे ७ मागण्या

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरून राजकारण तापताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापुरात मूक आंदोलन केले. यानंतर गुरुवारी संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर, मराठा आरक्षणप्रकरणीराज्य सरकार आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. (ashok chavan says state govt will file reconsideration petition in supreme court over maratha reservation)

मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासह संभाजीराजे उपस्थित होते. यानंतर अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. 

पुनर्विचार याचिका दाखल करणार 

मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. योग्य तयारी करून मगच पुन्हा एकदा न्यायालयासमोर बाजू मांडली जाणार आहे. पुनर्विचार याचिका नुसती दाखल करून अर्थ नाही.  ५० टक्के मर्यादा घालण्यात आली आहे. या बाबी पाहाव्या लागणार आहेत. आठवडाभरात पिटीशन दाखल झाली पाहिजे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. 

संभाजीराजे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे ७ मागण्या

मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली. संभाजीराजे यांनी मुख्यंत्र्यांसमोर सात प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. हॉस्टेल उपलब्ध करून द्यावेत, अशी त्यांची मागणी होती. आम्ही २३ जिल्ह्यात त्यासाठी जागा उपलब्ध  करून देत आहोत. कालबद्ध कार्यक्रम म्हणून आम्ही हे करू.  मुख्यमंत्री या विभागाचा आढावा घेऊन कारवाई कशी होते हे पाहणार आहेत, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

बाजी पलटली! बंडखोर पशुपतीकुमार पासरच झाले पक्षाध्यक्ष; बिनविरोध निवड

दरम्यान, भाजप खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडले. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षणासंदर्भातील मूक आंदोलनात उपस्थिती लावत संभाजीराजेंना मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे आवाहन केले होते.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAshok Chavanअशोक चव्हाणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPoliticsराजकारण