शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

निवडणुका आल्याने वारी आठवली, अशोक चव्हाण यांची शहा यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 6:01 AM

निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे आता भाजपाध्यक्ष अमित शहा सगळीकडे हिंडू लागतील. आज वारीत आले उद्या आणखी कुठे दिसतील.

मुंबई - निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे आता भाजपाध्यक्ष अमित शहा सगळीकडे हिंडू लागतील. आज वारीत आले उद्या आणखी कुठे दिसतील. वारी आणि पांडुरंग आमच्यासाठी आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. निवडणूक आणि मतांच्या राजकारणासाठी अशी धावाधाव आम्ही करत नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात लगावला.मेळाव्याला राज्यातील महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार आवर्जून उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील-निलंगेकर उपस्थित होते. प्रास्ताविकात अशोक चव्हाण म्हणाले की, जनता आॅनलाइन झाली असली, तरी सरकार मात्र आॅफलाइन झाले आहे. चार वर्षांच्या अपयशी कारभारानंतर भाजपाला आणीबाणीची आठवण झाली. मात्र, याच आणीबाणीनंतर १५ वर्षे राज्यात काँग्रेसचे सरकार होते, याचा भाजपाला विसर पडला आहे. चार वर्षांत मोदी सरकारने फक्त पोकळ आश्वासने दिली. त्यांनी काम केले नाही, म्हणून आपोआप आपले सरकार येणार नाही. त्यासाठी नेते, कार्यकर्त्यांना झपाटून काम करावे लागेल. देशाची चार वर्षांची बरबादी थांबविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने, एकोप्याने काम करायला हवे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले.आणीबाणीचा काळ दलितांना वरदान - शिंदेआणीबाणीच्या मुद्द्यावरून होणारी टीका अनाठायी आहे. याच आणीबाणीमुळे दलित व आदिवासींच्या विकासाला चालना मिळाली, हे सत्य विसरता येणार नाही. हरिजन, गिरीजन, वंचित समाजाला विकासाच्या संधी येथून मिळू लागल्या. ज्या बँका दारातही उभे करायच्या नाहीत, तेथे दलित, आदिवासींना कर्जे मिळू लागली, हे वास्तव आहे, असे शिंदे यांनी सांगितले.रस्त्यावर उतरावे लागेल - पृथ्वीराज चव्हाणदेशात आणि राज्यातील सरकारचा साराच कारभार भोंगळ बनला आहे. समाजातील प्रत्येक घटक त्रस्त झाला आहे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर काँग्रेसला मतभेद विसरावे लागतील. पक्षातील विस्कळीतपणा दूर करून जनतेच्या प्रश्नांवर नेते आणि कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस