शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

कोणत्याही क्षणी कोसळतील कडे!

By admin | Updated: June 25, 2015 23:32 IST

‘डोंगरांचा जिल्हा’ निद्रिस्त : तज्ज्ञांच्या समितीकडून ‘भूस्खलनप्रवण’ टापूंचे सर्वेक्षण अत्यावश्यक

राजीव मुळ्ये - सातारा -पावसाळा सुरू झाला की घाटात दरड कोसळणे, वाहतूक ठप्प होणे, क्वचितप्रसंगी वाहनावर दगड पडून जीवितहानी हे प्रकार नित्याचेच. परंतु ते कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची सुरुवातही अद्याप झालेली नाही. विज्ञानाच्या साह्याने निसर्गाला आव्हान देऊन विकास साधताना निसर्ग हेही एक ‘विज्ञान’ आहे याचा विसर पडल्याने ही परिस्थिती ओढवली असून, तज्ज्ञांच्या मदतीने वेळीच उपाय न शोधल्यास मोठ्या जीवितहानीस सामोरे जावे लागण्याचा दिवस दूर नाही. साताऱ्यासारखा ‘डोंगरांचा जिल्हा’ हा महाभयानक धोका दुर्लक्षित करतो आहे.अभियांत्रिकी कौशल्याने डोंगरी भागातून रस्ते काढून आपण विकास साधला, उंच डोंगरांवर इमारती उभारल्या; परंतु भूरूपशास्त्र आपण नेहमीच दुर्लक्षित केले आहे. भूरूप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते आणि त्याकडे डोळेझाक केली की अरिष्ट ओढवते. ‘दरड कोसळणे’ हे असेच अरिष्ट होय. जागतिक हवामानबदलाचा परिणाम म्हणून पावसाळ्यातील एकंदर पाऊस कमी होऊन एकाच वेळी अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. हे पाणी डोंगरावरून वेगाने खाली येते. वृक्षराजी कमी झाल्याने मातीची धूप वाढली आहे. परिणामी खडकांना एकमेकांशी बांधणारे दुवे कमकुवत होऊन दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.सातारा जिल्हा पश्चिम घाटाच्या छायेत वसलेला असून, जिल्ह्यात घाटरस्तेही भरपूर आहेत. प्रत्येक पावसाळ्यात कोठे ना कोठे दरड कोसळतेच. तथापि, ‘आपत्ती व्यवस्थापन’ एवढाच विषय अशा वेळी डोळ्यांसमोर येतो. त्याचेही नियोजन गरजेनुसार होत नाही. खरे तर दरड कोसळण्याच्या घटनेचे पूर्वानुमान शक्य आहे. तसेच हा धोका टाळण्यासाठी काही उपायही आपल्या हातात आहेत. तथापि, निसर्गाला ‘शास्त्र’ म्हणून स्वीकारणारा दृष्टिकोन त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे असायला हवा, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. दरड कोसळू नये म्हणून काही ठिकाणी तात्पुरते तर काही ठिकाणी कायमस्वरूपी उपाय करणेही शक्य असून, प्रशासनाने त्यासाठी भूरूपतज्ज्ञांची समिती नेमून तातडीने सर्वेक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे ‘विकास’ या एकाच शब्दामागे लपून निसर्गाला आव्हान देण्याच्या प्रयत्नांकडे डोळेझाक करता येणार नाही, असा इशाराही तज्ज्ञ देतात. डोंगराळ भागातील सपाटीकरणाच्या, कडे तोडण्याच्या प्रकारांना तातडीने आळा बसण्याची गरज ते व्यक्त करतात.असा आहे आपला सह्याद्रीसह्याद्री पर्वत अग्निजन्य खडकांचा बनलेला आहे. अनेक ज्वालामुखी होऊन थरावर थर जमून सह्याद्री बनला आहे. सुमारे दोन किलोमीटर जाडीच्या भूगर्भरचनेत असे एकंदर २९ थर पाहायला मिळतात. प्रत्येक दोन थरांच्या मध्ये एक ते दोन मीटर जाडीचे लाल मातीचे आवरण (रेड बोला) आहे. ही माती या २९ थरांना एकमेकांशी पक्के बांधून ठेवते. अशी कोसळते दरडप्रत्येक ठिकाणचे भूरूप त्या-त्या ठिकाणच्या नैसर्गिक स्थितीनुसार बनलेले असते. आपल्याकडील भूरूप जमिनीच्या झिजेमधून तयार झालेले आहे. झिजेचेही अनेक प्रकार आहेत. सह्याद्री पट्ट्यातील झीज प्रामुख्याने नैसर्गिक उतारावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे झालेली आहे. झिजेमुळे ‘ब्लॉक वेस्टिंग’ (मोठ्या शिळेच्या आसपास झीज होऊन त्या शिळेचा आधार तुटण्याची प्रक्रिया) घडून येते आणि ती शिळा कोसळते. त्यालाच आपण दरड कोसळणे असे म्हणतो.कडे कापून रस्ते रुंद करणे घातक असते. डोंगराळ भागात विकासकामे करताना ‘इकॉलॉजिकल’ आणि ‘जिओलॉजिकल इंजिनिअरिंग’चा विचार करायला हवा. भूगर्भरचना समजावून घ्यायला हवी. हे काम सोपे नाही. परंतु संवेदनशील प्रशासन यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करू शकते. हे तज्ज्ञही ‘नावाचे’ नसावेत. आत्मीयतेने या कामासाठी वेळ देणारे तज्ज्ञ नेमून प्रशासनाने कडे आणि घाटरस्त्यांचे सर्वेक्षण करावे.- प्रा. एम. के. गरुड, भूरूपतज्ज्ञकोसळणाऱ्या शिळा थोपवू याडोंगराळ भागात माथा ते पायथा टप्पे करून वनीकरणप्रत्येक टप्प्यावरील झाडांचे प्रकार निसर्गनियमानुसारसुटलेल्या कड्यांची पाहणी करून गरजेनुसार दरजांचे सिमेंटीकरणसिमेंटीकरण अशक्य असेल अशा ठिकाणी गॅबियन जाळ्याघाटरस्ते रुंद करण्यापूर्वीच भूरचनाशास्त्राचा विचारतातडीच्या उपाययोजनाजिल्हास्तरावर भूरूपतज्ज्ञांच्या समितीची स्थापना करून पाहणीदरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचा शोध घेणेत्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार आपत्ती टाळण्याचे उपायडोंगराळ भागातील प्रकल्पांना तज्ज्ञांच्या पाहणीनंतरच परवानाकमीत कमी खोदाई, सपाटीकरण; अवजड यंत्रसामग्री टाळणेडोंगराळ भागात विहिरी, विंधनविहिरींची संख्या आटोक्यात ठेवणे