शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

राज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 6:00 AM

राज्यातील १८० तालुक्यांमध्ये तत्काळ दुष्काळसदृश स्थिती जाहीर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली.

मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये तत्काळ दुष्काळसदृश स्थिती जाहीर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. या तालुक्यांत कृषी कर्जवसुलीला स्थगिती व विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. सर्वेक्षण करून ३१ आॅक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी आधी घेतली होती; पण आज थेट हा निर्णय घेतला.या निर्णयामुळे १८० तालुक्यांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलातून सूट, कृषीकर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात सूट, वीज खंडित न करणे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट मिळेल. तसेच रोहयो कामांच्या निकषात सूट, टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हेही तालुक्यांमध्ये लागू झाले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात येईल आणि त्यानंतर केंद्र सरकार मदत जाहीर करेल, असे ते म्हणाले. दुष्काळग्रस्त भागांत चारा छावण्या सुरू करण्याची वेळ अद्याप आलेली नाही, असे ते म्हणाले.दुष्काळग्रस्त तालुकेमराठवाडा : औरंगाबाद : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड. बीड : आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर, वडवणी, अंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा. हिंगोली : हिंगोली, कळमनुरी, सेनगाव. जालना : बदनापूर, घनसावगी, भोकरदन, जालना, परतुर. लातूर : शिरूर अनंतपाळ. नांदेड : मुखेड, उमरी, देगलुर. उस्मानाबाद : लोहारा. परभणी : पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू.विदर्भ : अकोला : अकोला, बाळापूर, तेल्हारा, मूर्तिजापूर. अमरावती : अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, वरूड, अंजनगाव सुर्जी. भंडारा : लाखनी, मोहाडी, पवनी. बुलडाणा : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, मोताळा, सिंदखेड राजा. चंद्रपूर : भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, राजुरा, सिंदेवाही, वरोरा. गोंदिया : देवरी, मोरगाव अर्जुनी, (पान १० वर)(पान १ वरून) सालेकसा. नागपूर : कळमेश्वर, काटोल, नरखेड. वर्धा : आष्टी, कारंजा, समुद्रपूर, वाशिम: रिसोड, यवतमाळ - बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड, यवतमाळ.उत्तर महाराष्ट्र : अहमदनगर : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड. धुळे : धुळे, शिरपूर, शिंदखेडा. जळगाव : अमळनेर, भडगाव, भूसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल. नंदुरबार : नंदुरबार, शहादा, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ - तळोदे. नाशिक : गंभीर स्वरूपाचा दुष्काळ - देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, सिन्नर, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ -चांदवड.पश्चिम महाराष्ट्र : कोल्हापूर : हातकणंगले, कागल, राधानगरी. पुणे : आंबेगाव, घोडेगाव, बारामती, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, सासवड, पुरंदर, शिरूर, वेल्हे, घोडनदी, घोडेगाव. सांगली : आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ, पलूस, जत, खानापूर, विटा. सातारा : खंडाळा, मान दहीवडी, फलटण, कराड, कोरेगाव, वाई. सोलापूर : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ.कोकण : पालघर : पालघर, तलासरी, विक्रमगड. रायगड : माणगाव, सुधागड, श्रीवर्धन. रत्नागिरी : मंडणगड. सिंधुदुर्ग, वैभववाडी.>दुष्काळाऐवजी दुष्काळसदृश स्थिती जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारसदृश आभार !- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख>२०१६ च्या निकषांमुळे अनेक तालुके मदतीपासून वंचित राहणार आहेत. ते निकष रद्द होईपर्यंत शेतकºयांच्या पदरात काही पडणार नाही. त्यामुळे ही घोषणा फसवी आहे. - धनंजय मुंडे,विरोधी पक्षनेते, विधान परिषद

टॅग्स :droughtदुष्काळ