शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

संघटन उभे न केल्याची अण्णांच्या मनाला सल

By admin | Updated: March 16, 2015 02:26 IST

अनेक वर्षांपासून दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात आंदोलने केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मी जर संघटन उभे केले असते,

पुणे : अनेक वर्षांपासून दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात आंदोलने केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मी जर संघटन उभे केले असते, तर त्याचा फायदा समाजहितासाठी झाला असता, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी व्यक्त केली. भूसंपादन विधेयकाविरोधातील हजारे यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचा समारोप महात्मा गांधी भवन येथे रविवारी झाला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेस स्वाभिमानीचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह अण्णा हजारे उपस्थित होते. यावेळी शेतकरी हिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले.केंद्रातील यापूर्वीचे सरकार किमान पत्राला उत्तरे देत होते. मात्र, केंद्रातील भाजपा सरकारबरोबर भूसंपादन कायद्यात बदल करण्यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जनजागृतीसाठी वर्धा सेवाग्राम ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार आहे, असे हजारे यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून दंडुकशाही आणि षड्यंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्याचा अंदाज घेऊनच आंदोलन सुरू करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाच्याविरोधात हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा राहणार आहे, अशी भूमिका खा. राजू शेट्टी यांनी जाहीर केली. माजी कृषी पणन संचालक डॉ. सुभाष माने, समाजसेविका वर्षा काळे, उद्योजक कैलास वाणी यांनी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, सरकार चुकेल, त्यावेळी विरोध करणे हा आमचा नैतिक अधिकार आहे. सत्तेत असलो आणि नसलो तरी काही फरक पडणार नाही. आम्ही स्वत:हून महायुतीतून बाहेर पडणार नाही, पण आम्हाला सोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यावा, असेही शेट्टी म्हणाले.