शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

संघटन उभे न केल्याची अण्णांच्या मनाला सल

By admin | Updated: March 16, 2015 02:26 IST

अनेक वर्षांपासून दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात आंदोलने केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मी जर संघटन उभे केले असते,

पुणे : अनेक वर्षांपासून दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात आंदोलने केली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मी जर संघटन उभे केले असते, तर त्याचा फायदा समाजहितासाठी झाला असता, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी व्यक्त केली. भूसंपादन विधेयकाविरोधातील हजारे यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचा समारोप महात्मा गांधी भवन येथे रविवारी झाला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेस स्वाभिमानीचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह अण्णा हजारे उपस्थित होते. यावेळी शेतकरी हिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले.केंद्रातील यापूर्वीचे सरकार किमान पत्राला उत्तरे देत होते. मात्र, केंद्रातील भाजपा सरकारबरोबर भूसंपादन कायद्यात बदल करण्यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जनजागृतीसाठी वर्धा सेवाग्राम ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार आहे, असे हजारे यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून दंडुकशाही आणि षड्यंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्याचा अंदाज घेऊनच आंदोलन सुरू करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाच्याविरोधात हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा राहणार आहे, अशी भूमिका खा. राजू शेट्टी यांनी जाहीर केली. माजी कृषी पणन संचालक डॉ. सुभाष माने, समाजसेविका वर्षा काळे, उद्योजक कैलास वाणी यांनी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, सरकार चुकेल, त्यावेळी विरोध करणे हा आमचा नैतिक अधिकार आहे. सत्तेत असलो आणि नसलो तरी काही फरक पडणार नाही. आम्ही स्वत:हून महायुतीतून बाहेर पडणार नाही, पण आम्हाला सोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यावा, असेही शेट्टी म्हणाले.