शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र, तेलंगणप्रमाणे राज्यात कर्जमाफी कधी?

By admin | Updated: July 17, 2015 00:30 IST

आंध्र प्रदेश व तेलंगण ही राज्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असतील तर महाराष्ट्रात कर्जमाफी का नाही, असा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

मुंबई : आंध्र प्रदेश व तेलंगण ही राज्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असतील तर महाराष्ट्रात कर्जमाफी का नाही, असा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता कर्ज काढण्याची सूचनाही त्यांनी केली.शेतकरी आत्महत्या व राज्यातील दुष्काळी परिस्थिती याबाबत सत्ताधारी व विरोधक यांनी मांडलेल्या प्रस्तावरील चर्चेला गुरुवारी सभागृहात सुरुवात झाली. मुंडे यांनी हा प्रस्ताव मांडला. त्या वेळी ते म्हणाले की, या सरकारचा पायगुण चांगला नाही. गेल्या सात महिन्यांत १८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाचे भाव ५० टक्के वाढवू, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. प्रत्यक्षात शेतीमालाच्या दरात केवळ ५ टक्के वाढ झाली. कापसाला ६ हजार रुपयांचा दर देण्याकरिता मोर्चे काढणाऱ्यांच्या सरकारच्या काळात ३८०० रुपयांपेक्षा दर मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत असताना आता कुणाकुणावर ३०२ कलमाखाली गुन्हे दाखल करायचे, असा सवाल मुंडे यांनी केला.यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांकरिता ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र त्यापैकी ४ हजार कोटी रुपयेदेखील शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, असे मुंडे म्हणाले. लाचार होऊन सत्तेत राहायचे आणि कर्जमुक्तीची मागणी करायची, अशी दुटप्पी भूमिका घेऊ नका, असा टोला मुंडे यांनी शिवसेनेला लगावला. लक्षावधी शेतकऱ्यांनी मोदींना मोठ्या आशेने मतदान केले आहे.शिपाई, वाहन चालक हवे कशाला?शेतकरी असंघटित आहेत तर राज्य सरकारी कर्मचारी संघटित आहेत. सरकार एक रुपयातील ८२ पैसे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करते. शिपाई, वाहन चालक ही पदे कशाला हवी? आता सातवा वेतन आयोगाचा भार पडणार आहे. सरकारी पदांमधून काही पदे रद्द केल्यास सरकारचे २५ हजार कोटी रुपये वाचतील, असा दावा शेतकरी व कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी केला.