शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचा बोलबाला! विज्ञान : प्राची नालिंदे मुलींमध्ये विभागातून अव्वल विज्ञान : वैभव भगत मुलांमध्ये विभागातून अव्वल वाणिज्य : क्षितीज गोयनका

By admin | Updated: June 3, 2014 01:50 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अकोल्याची प्राची अनिल नालिंदे ही ९६.६१ टक्के गूण घेऊन विज्ञान शाखेमध्ये अमरावती विभागात अव्वल ठरली आहे. वैभव भगत (विज्ञान) हा ९६.४६ टक्के गूण घेऊन विभागातून द्वितीय तर मुलांमधून अव्वल ठरला आहे. अकोल्याचाच क्षितीज गोयनका हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी ९५.६९ टक्के गूण घेऊन विदर्भात अव्वल ठरला आहे.

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अकोल्याची प्राची अनिल नालिंदे ही ९६.६१ टक्के गूण घेऊन विज्ञान शाखेमध्ये अमरावती विभागात अव्वल ठरली आहे. वैभव भगत (विज्ञान) हा ९६.४६ टक्के गूण घेऊन विभागातून द्वितीय तर मुलांमधून अव्वल ठरला आहे. अकोल्याचाच क्षितीज गोयनका हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी ९५.६९ टक्के गूण घेऊन विदर्भात अव्वल ठरला आहे.अमरावती विभागाच्या निकालात अकोला जिल्‘ाने आघाडी घेतली आहे. अकोला जिल्‘ाचा निकाल ९३.३६ टक्के लागला असून, बुलडाणा जिल्‘ाचा ९२.७१ टक्के तर वाशिम जिल्‘ाचा निकाल ९२.५२ टक्के लागला आहे.बारावीच्या निकालात अकोल्याच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. निकालामध्ये यावर्षीही मुलींचाच बोलबाला दिसून आला. अकोला जिल्‘ात उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ९५.७४ तर मुलांची टक्केवारी ९१.२३ इतकी आहे. अकोल्यातील ज्योती जानोळकर कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थीनी प्राची अनिल नालिंदे ही विभागातून अव्वल ठरली. तिला ९६.६१ टक्के गूण मिळाले आहेत. जिल्हा परिषद आगरकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी वैभव भगत हा ९६.४६ टक्के गूण घेऊन विभागात मुलांमधून अव्वल ठरला. बुलडाणा जिल्‘ात ९५.0७ टक्के मुली तर ९0.९४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. बुलडाणा जिल्‘ाने यावर्षी अमरावती विभागात द्वितीय क्रमांक पटकावून आपला लौकीक कायम ठेवला आहे. बुलडाणा जिल्‘ातील २३ हजार ८१८ विद्यार्थी परिक्षेसाठी नोंदविले गेले होते. प्रत्यक्षात २३ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यामध्ये २२ हजार ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा निकाल ९२.७१ टक्के एवढा लागला आहे. जिल्‘ातील पुनर्परिक्षार्थींची संख्या २ हजार ९६ एवढी होती. प्रत्यक्षात २ हजार २१ एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परिक्षा दिली, त्यापैकी ७६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ३७.९० आहे. जिल्‘ातील सर्व १३ तालुक्यांमध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. जिल्‘ातील २७ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.वाशिम जिल्‘ात ९४.२६ टक्के मुली तर ९१.३१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. वाशिम जिल्‘ाचा निकाल ९२.५२ टक्के लागला आहे. गतवर्षी वाशिम जिल्हा ८५.२५ टक्के निकालासह विभागातून प्रथम स्थानावर होता. यंदा वाशिम जिल्हा विभागात तिसरा असला तरी निकालाची टक्केवारी वाढली आहे. वाशिम जिल्‘ातून परीक्षेसाठी ११,७७१ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. प्रत्यक्षात ११,७६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १०,८८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्‘ात मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.३१ टक्के तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४ टक्के एवढी आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. जिल्‘ातील १३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.