शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 09:20 IST

Maharashtra Assembly Election 2024 : "2014 ला नाहक माझा बळी घेण्यात आला. अजित पवारांनी माझे सरकार पाडले आणि भाजपच्या राजवटीची मुहुर्तमेड केली..."

आपल्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला. त्याच्या चौकशीसंदर्भातील फाइलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला ही फाइल दाखवली. आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापण्याचा प्रयत्न केला. असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी तासगाव येथील प्रचार सभेदरम्यान केले होते. यानंतर आता यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. 

अजित दादांच्या दाव्यासंदर्भात एबीपी माझासोबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "सिंचन घोटाळा काही त्यांची पाठ सोडत नाही. मी जेव्हा सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन विभागाला दिला होता. मी माझ्या  कार्यकाळात कधीही 70 हजार कोटिंचा घोटाळा, असा शब्द वापरला नव्हता. श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी नाही. श्वेतपत्रिका यासाठी की, अजित पवारांच्या 2010-11 च्या आर्थिक पाहणी अहवालात 70 हजार कोटी रुपये गेल्या 10 वर्षांत खर्च झाले आणि सिंचनाची टक्केवारी 18.0 वरून 18.1 झाली. हे अजित पवारांच्या नियोजन मंडळाच्या अहवालातनमूद करण्यात आले होते."

मी जेव्हा 'ते' बघितले तेव्हा मला धक्का बसला -"मी नव्याने मुख्यमंत्री म्हणून आलो होतो. मी जेव्हा ते बघितले तेव्हा मला धक्का बसला. यामुळे मी सिंचन खात्याला विचारले की, तुम्ही 70 हजार कोटी खर्च केले हे बरोबर आहे का? ते अजित पवारांच्या अहवालात होतं आणि सिंचनाच्या टक्केवारीत  काही फार वाढ झालेली नाही. म्हणून नेमकी वस्तूस्थिती काय? तो वस्तूस्थिती अहवाल शासनाला सादर करा, असे मी सिंचन विभागाला सांगितले. चौकशी करायची असती तर ती अँटी करप्शनने केली असती. मात्र, पुन्हा चुका होऊ नयेत हा त्यामागचा उद्देश होता. पण पुढे मग त्याची चौकशी झाली. विधीमंडळात चर्चा झाली," असे चव्हाण यांनी सांगितले.

...2014 ला नाहक माझा बळी घेण्यात आला -"या प्रकरणाची विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चर्चा व्हावी, असा एक अहवाल खालून आला आणि तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला गेला. त्यात अँटी करप्शनला चौकशीचे आदेश द्या, असे त्यात लिहिण्यात आले होते. मला नंतर कळले की गृहमंत्र्यांनी आपल्या पातळीवर त्याला मान्यता दिली. ज्याचा उल्लेख आज अजित पवारांनी केला आहे. ती फाईल माझ्याकडे आली नाही. त्या फाईलवर माझी कुठलीही सही नाही. त्यामुळे 70 हजार कोटींच्या सिंचनच्या प्रकरणात मी चौकशी लावली नव्हती. 2014 ला नाहक माझा बळी घेण्यात आला. अजित पवारांनी माझे सरकार पाडले आणि भाजपच्या राजवटीची मुहुर्तमेड केली," असे चव्हाण म्हणाले.

मी अद्यापही ती फाईल बघितलेली नाही -"आता ही वस्तूस्थिती आहे की, मी अद्यापही ती फाईल बघितलेली नाही. ती फाईल गृहमंत्र्यांच्या पातळीवरून मान्यता मिळून खाली गेली. आता गृमंत्र्यांनी कुणाला विचारलं का की स्वतःच्या पातळीवर निर्णय घेतला? हे मला माहीती नाही आणि आता आपण त्यांना विचारूही शकत नाही. त्यामुळे अजित पवार जे बोलले ते खरे आहे. पण त्यांनी पुढे माझा काय दोष आहे, हेही सांगितले असते तर बरे झाले असते," असेही चव्हाण म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस