शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

"...तर जमीन परत द्यावी लागणार"; वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीशीवर AIMIM आमदाराचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 17:08 IST

मालेगावचे एआयएमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी यांनी लातूरमधल्या घटनेवर भाष्य केलं आहे.

Waqf Board claims on agricultural land : लातूर जिल्ह्यातील तळेगावातील ७५ टक्के जमिनीवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. गावातील १०३ शेतकऱ्यांचा ३०० एकर जमिनीचा यात समावेश आहे. जमिनी परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवल्या आहेत. यामुळे आता अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये भीतीचं वातावरण परसलं आहे. तळेगावातील शेतकऱ्यांनी आता महाराष्ट्र सरकारकडे याबाबत न्याय मागितला आहे. दुसरीकडे, मालेगावचे एआयएमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी यांनी जर जमीन वक्फ बोर्डाची असेल तर ती परत करावी लागेल असं म्हटलं आहे.

लातूर जिल्ह्याच्या तळेगावातील ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. वक्फ बोर्डाची संपत्ती इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते. त्यातून वक्फ बोर्डाने लातूरमधील १०३ शेतकऱ्यांना नोटीस पाठवली आहे. या जमीन वादात सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ प्राधिकरणाकडे सुनावणीस गेले आहे. त्यावर बोलताना शेतकऱ्यांकडे जर कागदपत्रे असतील तर अशा १०० नोटीस आल्या तरी काय फरक पडणार आहे असा सवाल केला आहे. 

"शेतकरी जर जमीन त्यांची आहे असा दावा करत असतील तर आणि त्यांच्याकडे पुरावे, कागदपत्रे असतील तर वक्फ बोर्डाने १०० नोटीस पाठवल्या तरी काय फरक पडणार आहे. पण जर ती जागा वक्फ बोर्डाची आहे आणि शेतकरी तिथे शेती करत असतील तर वक्फ बोर्डाला जमीन परत घेण्यासाठी अधिकार आहे. याच्यात कोणती चुकीची गोष्ट आहे," असा सवाल मुफ्ती इस्माईल कासमी यांनी केला आहे.

"माझं हेच म्हणणं आहे की, जर वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली असेल तर हे काम ट्रिब्युनल कोर्टाचं आहे. त्यांनी पाहायला हवं की कोणाकडे मालकी हक्काची कागदपत्रे आहेत. जर त्या जागा वक्फ बोर्डात रजिस्टर असतील तर बोर्डाला आज नाही तर उद्या शेतकऱ्यांना ती जमीन परत द्यावी लागेल. जर ती शेतीची जागा शेतकऱ्यांची असेल आणि त्यांनी कागदपत्रे दिली तर १०० नोटीस पाठवल्या तर शेतकऱ्यांना काही फरक पडणार नाही. कायदे नियमानुसार ज्यांच्याकडे कागदपत्रं असणार ते या जमिनीचे मालक आहेत. त्यांचा अधिकार असतो की त्यांची जमीन त्यांना मिळावी हा नियम आहे. दोन्ही पक्ष कोर्टात जातील आणि त्यावर निर्णय घेतला जाईल," असं मुफ्ती इस्माईल कासमींनी म्हटलं.

"मंदिरांची किंवा एखाद्या हिंदूंची जागा मुस्लिमांनी घेतल्याची एकही घटना तुम्ही सांगू शकत नाही. पण आज सगळ्या देशात मुस्लिमांच्या मशिदी, दर्ग्यावरुन ज्याप्रकारे वाद निर्माण केला जात आहे," असंही मुफ्ती इस्माईल कासमी म्हणाले. 

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र