शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

३ घटना, आरोप-प्रत्यारोप, आव्हानांची भाषा...; निवडणुकीपूर्वी महायुती तुटण्याचे संकेत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 17:13 IST

विधानसभा निवडणुकीला आता काहीच महिने शिल्लक आहेत त्याआधीच महायुतीत खटके वाजायला सुरूवात झाली आहे. 

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहे. भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या तिन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आव्हानांची भाषा वापरत आहे. कुठे भाजपा राष्ट्रवादीला विरोध करतंय तर कुठे शिवसेना भाजपावर आरोप करतंय, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही स्थानिक पातळीवर बिनसल्याचं दिसून येते. मागील ३ दिवसांतील ३ घटनांमुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुती तुटण्याचे हे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

पहिली घटना 

अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुण्यातील जुन्नर तालुक्यात गेली असताना त्याठिकाणी भाजपा नेत्या आशा बुचके यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. तिथे अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर महायुतीत वाद निर्माण करणाऱ्या घटकांना समज द्यावी असं विधान सुनील तटकरेंनी केले. तर या प्रकरणी आमदार अमोल मिटकरींनी देवेंद्र फडणवीसांकडे खुलासा मागितला. त्यावर भाजपा आमदार जगदीश मुळीक यांनी मिटकरींची लायकी काढत त्यांच्यावर निशाणा साधला. 

दुसरी घटना 

मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून शिवसेना नेते रामदास कदमांनी भाजपा नेते मंत्री रवींद्र चव्हाणांवर आगपाखड केली. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी कदमांनी केली. त्यावर रवींद्र चव्हाणांनीही पलटवार करत रामदास कदम अडाणी माणूस, तोंड सांभाळून बोलावे अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान दिले. त्यावर माझे तोंड फोडायला तुला १०० जन्म घ्यावे लागतील. राक्षसी महत्वकांक्षा असणाऱ्यांना बाजूला काढा अन्यथा आम्ही वेगळे लढू असं रामदास कदमांनी म्हटलं. त्यावर भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी रामदास कदमांनी बालिश विधाने करू नये. आमचीही स्वतंत्र्य लढण्याची तयारी आहे असं प्रत्युत्तर दिले. रामदास कदमांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनीही नाराजी व्यक्त केली. 

असले आरोप करणं कोणत्या युतीधर्मात बसतं? रामदास कदम यांचे काही म्हणणं असेल तर ते त्यांनी अंतर्गत मांडले पाहिजे. अशा प्रत्येक वेळी भाजप आणि नेत्यांना वेठीस धरणं यातून चांगली भावना तयार होत नाही. रामदास कदम यांचे काय म्हणणं आहे हे समजून घेऊन आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करेन. रामदास कदम असं वारंवार टोकाचं बोलतात. त्यामुळे आमची मने देखील दुखावली जातात. शेवटी आम्ही देखील माणसं आहोत आणि ५० गोष्टी आम्हाला देखील त्यांच्या उत्तरासाठी बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळलं पाहिजे. वारंवार भाजपला असं बोलणं आम्हाला मान्य नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सुनावलं. 

तिसरी घटना 

रायगड येथील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्यावर आरोप करत ते विश्वासघातकी असल्याचं म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विश्वासघात करणारी पार्टी आहे, हे मी आज जाहीरपणाने सांगतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं, हेच त्यांचं काम आहे, हे आज आपण कर्जतमध्ये पाहत आहात. या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्वच विश्वासघातकी आहे असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं. 

त्यावर महेंद्र थोरवे हे माझ्यासाठी अदखलपात्र आहेत, त्यांना आमचे स्थानिक नेते उत्तर देतील असा खोचक टोला सुनील तटकरेंनी लगावला. त्यानंतर राष्ट्रवादीचे रायगडचे सुधाकर घारे यांनी शिवसेना आमदार थोरवेंवर निशाणा साधला. २०१४ मध्ये शिवसेनेनं तिकीट न दिल्यानं त्यांनी शेकापकडून निवडणूक लढवली. त्यानंतर हरल्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत आले. २०१९ ला त्यांना शिवसेनेनं तिकिट दिले तिथून ते निवडून आले त्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात गेले. त्यामुळे विश्वासघात कोण करतंय हे जनतेला माहिती आहे असा पलटवार राष्ट्रवादीने शिवसेना आमदारावर केला. त्यामुळे मागील २ दिवसांत घडलेल्या या घटनांमुळे महायुतीतील मतभेद समोर आले आहेत.  

टॅग्स :MahayutiमहायुतीBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४