शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पार्थ पवारांच्या 'त्या' आक्रमक ट्विटवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ही तर 'सत्यमेव जयते'कडे वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 17:40 IST

पार्थ पवार यांच्या भाजप प्रवेशावर देखील केले हे वक्तव्य..

पुणे: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत मोर्चे, आंदोलने, निदर्शने यांच्या माध्यमातून मराठा समाज व्यक्त होत आहे. त्यातच आरक्षणाच्या मुद्दयावरून बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. मात्र या घटनेवर पार्थ पवार यांनी केलेल्या 'त्या' आक्रमक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व राम कदम यांनी घेतलेल्या जाहीर भूमिकांमुळे पार्थ पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी देखील चांगलाच जोर पकडला.     

बीड जिल्ह्यातील केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे (१८) या विद्यार्थ्याने ''मी मेल्यानंतर तरी केंद्र आणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझे मरण सार्थक होईल, अशी चिठ्ठी लिहून गळफास घेतला. बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी बीड जिल्ह्यातील घटनेवर ''दुर्देवी घटनांचे सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जागं व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं,'' अशा आशयाचे ट्विट केले. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपला ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याची संधी मिळाली. 

पुण्यात खासदार गिरीश बापट व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाला गुरुवारी सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

पाटील म्हणाले, पार्थ पवार यांची 'सत्यमेव जयते'कडे वाटचाल सुरू आहे. पण याचवेळी पार्थ यांच्या भाजप प्रवेशावर 'असा कुठलाही प्रस्ताव अजूनतरी आलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्राला काढता येणे कदापि शक्य नाही. आरक्षण हा राज्याचा विषय आहे. ही बाब इतकी वर्ष राजकारणात सक्रिय असणाऱ्या शरद पवारांना माहिती नाही का? असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. 

तर दुसरीकडे भाजप प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी देखील पार्थ यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.  तसेच पार्थ यांच्या मागणीची राज्य सरकार यावेळी तरी गंभीर दखल घेणार की पुन्हा कवडीची किंमत देणार?' असा खोचक प्रश्न विचारत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलparth pawarपार्थ पवारBJPभाजपाState Governmentराज्य सरकारMaratha Reservationमराठा आरक्षणAjit Pawarअजित पवार