शहरं
Join us  
Trending Stories
1
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
2
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
3
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
4
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
5
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
6
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
7
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
8
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
9
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
10
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
11
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
12
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
13
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
14
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
15
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
16
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
17
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
18
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
19
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
20
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल

अणुऊर्जेविरोधात शिवसेनेचा पुन्हा एल्गार

By admin | Updated: March 16, 2015 00:06 IST

राजेंद्र महाडिक : रत्नागिरीत गुरूवारी मोर्चा

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेनेने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. दि. १९ रोजी मोर्चा काढून प्रकल्पाचे रत्नागिरीतील कार्यालय उद्ध्वस्त करण्याचा इशारा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, उपनगराध्यक्ष संजय साळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली जैतापूर प्रकल्पाविरोधात दि. १९ मार्च रोजी रत्नागिरीतील या प्रकल्पाच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात लढा उभारणार आहे. त्यासाठी रत्नागिरी, राजापूर, लांजा या तीन तालुक्यांसह जिल्ह्याचा पाठिंबा असल्याचे यावेळी महाडिक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणेच हे आंदोलन होत असून, शिवसेना आजही जनतेच्या बाजूने आहे. हा मोर्चा प्रकल्पाच्या रत्नागिरी शहरातील कार्यालयावर नेला जाणार आहे. त्यावेळी कार्यालय उद्ध्वस्त करून ते कायमचे बंद करू, असाही इशारा त्यांनी दिला.आमदार राजन साळवी म्हणाले की, जैतापूर प्रकल्पासाठी ९३८ हेक्टर जमीन संपादित केली आहे. सत्तेत गेल्यामुळे शिवसेनेची प्रकल्पाबाबतची भूमिका बदललेली नाही. २००६ पासून या प्रकल्पाविरोधात आंदोलन करीत आहोत. आपण आंदोलन केले नसते तर हा प्रकल्प ५ ते ६ वर्षांपूर्वीच पूर्ण झाला असता. मात्र, शिवसेनेच्या आंदोलनामुळे या प्रकल्पाची एक भिंतही पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प निघून जाईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे. (शहर वार्ताहर)