शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

अणुऊर्जेविरोधात शिवसेनेचा पुन्हा एल्गार

By admin | Updated: March 16, 2015 00:06 IST

राजेंद्र महाडिक : रत्नागिरीत गुरूवारी मोर्चा

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेनेने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. दि. १९ रोजी मोर्चा काढून प्रकल्पाचे रत्नागिरीतील कार्यालय उद्ध्वस्त करण्याचा इशारा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, उपनगराध्यक्ष संजय साळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली जैतापूर प्रकल्पाविरोधात दि. १९ मार्च रोजी रत्नागिरीतील या प्रकल्पाच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात लढा उभारणार आहे. त्यासाठी रत्नागिरी, राजापूर, लांजा या तीन तालुक्यांसह जिल्ह्याचा पाठिंबा असल्याचे यावेळी महाडिक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणेच हे आंदोलन होत असून, शिवसेना आजही जनतेच्या बाजूने आहे. हा मोर्चा प्रकल्पाच्या रत्नागिरी शहरातील कार्यालयावर नेला जाणार आहे. त्यावेळी कार्यालय उद्ध्वस्त करून ते कायमचे बंद करू, असाही इशारा त्यांनी दिला.आमदार राजन साळवी म्हणाले की, जैतापूर प्रकल्पासाठी ९३८ हेक्टर जमीन संपादित केली आहे. सत्तेत गेल्यामुळे शिवसेनेची प्रकल्पाबाबतची भूमिका बदललेली नाही. २००६ पासून या प्रकल्पाविरोधात आंदोलन करीत आहोत. आपण आंदोलन केले नसते तर हा प्रकल्प ५ ते ६ वर्षांपूर्वीच पूर्ण झाला असता. मात्र, शिवसेनेच्या आंदोलनामुळे या प्रकल्पाची एक भिंतही पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प निघून जाईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे. (शहर वार्ताहर)