शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटील यांचा मृतदेह घेतला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 6:08 AM

सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, धर्मा पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर विखरण (जि.धुळे) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/धुळे : सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, धर्मा पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर विखरण (जि.धुळे) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून, सरकारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथे उभारण्यात येणाºया सौरऊर्जा (पूर्वीचा औष्णिक) प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्राण पणाला लावून थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणारे विखरण येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील (वय ८०) यांनी, २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तातडीने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मा पाटील यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. मात्र, वडिलांना योग्य न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांचे पुत्र नरेंद्र्र पाटील यांनी घेतली होती. हे प्रकरण अंगलट येणार असे दिसताच, घाईघाईत पत्रकार परिषद घेत, या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसे लेखी आश्वासन पाटील कुटुंबीयांना देण्यात आले, तर धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जे. जे. रुग्णालयात जाऊन नरेंद्र पाटील यांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. या घडामोडीनंतर नातेवाईक धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेऊन धुळ्याकडे रवाना झाले.हत्येचा गुन्हा दाखल कराहे सरकार गेंड्यांच्या कातडीचे असून, शेतकºयांना न्याय देऊ शकत नाही. या प्रकरणी तहसीलदार, जिल्हाधिकाºयांना तातडीने निलंबित केले पाहिजे.- धनंजय मुंडे,विरोधी पक्षनेते, विधान परिषदधर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून, या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे.- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलFarmerशेतकरी