शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Maharashtra Government: अजित पवारांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंचा राज्याच्या राजकारणातील वावर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 12:53 IST

Maharashtra News: अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व उभं करण्याच्या हालचाली तर सुरू झाल्या नाही ना, अशा चर्चा रंगत आहे. यात किती तथ्य आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे. 

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे सध्यातरी बंडखोरांचे बंड शांत झाले असं चित्र राज्याच्या राजकारणात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनअजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र शरद पवारांनी घेतलेली भूमिका आणि अजित पवारांची माघार यामुळे सरकार स्थापनेत अडचण आली नाही. मात्र राष्ट्रवादीत धुमसत असलेली बंडाची आग शांत झाली, असं म्हणणे अद्याप कठीण आहे. 

अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे अनेकांना वाटले की, काका शरद पवार यांच्याविरुद्ध अजितदादांनी बंड पुकराले. मात्र आपण केवळ भूमिका घेतली होती, असं सांगून ते बंड नव्हतं असं अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना तसेच पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.  

खुद्ध सुप्रिया सुळे यांनी व्हाट्स अॅप स्टेटसवर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे कुटुंबात आणि पक्षात फूट पडल्याचे त्यांनी नमूद केले होते. तर कार्यकर्त्यांमधून राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडेच येणार असं चित्रही निर्माण झालं होतं. त्यातच सुप्रिया सुळे शरद पवारांच्या साथीत मैदानात उतरल्या आहेत. यामुळे या चर्चांना बळ मिळात आहे. 

सरकार स्थापन करण्याच्या घडामोडींमध्ये सुप्रिया आघाडीवर दिसल्या. आमदारांच्या शपथविधीच्या दिवशी त्या जातीने गेटवर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित सर्वच पक्षांच्या आमदारांचे स्वागत केले. तर नव्याने निवडून आलेल्या आमदारांची गळाभेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या सोहळ्यातही त्या आघाडीवर दिसत होत्या. या व्यतिरिक्त सुप्रिया सुळे यांची दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरे यांच्या संदर्भातील एक पोस्टही आली होती. 

एकूणच अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व उभं करण्याच्या हालचाली तर सुरू झाल्या नाही ना, अशा चर्चा रंगत आहे. यात किती तथ्य आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019