शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: अजित पवारांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंचा राज्याच्या राजकारणातील वावर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 12:53 IST

Maharashtra News: अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व उभं करण्याच्या हालचाली तर सुरू झाल्या नाही ना, अशा चर्चा रंगत आहे. यात किती तथ्य आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे. 

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे सध्यातरी बंडखोरांचे बंड शांत झाले असं चित्र राज्याच्या राजकारणात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनअजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र शरद पवारांनी घेतलेली भूमिका आणि अजित पवारांची माघार यामुळे सरकार स्थापनेत अडचण आली नाही. मात्र राष्ट्रवादीत धुमसत असलेली बंडाची आग शांत झाली, असं म्हणणे अद्याप कठीण आहे. 

अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे अनेकांना वाटले की, काका शरद पवार यांच्याविरुद्ध अजितदादांनी बंड पुकराले. मात्र आपण केवळ भूमिका घेतली होती, असं सांगून ते बंड नव्हतं असं अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना तसेच पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.  

खुद्ध सुप्रिया सुळे यांनी व्हाट्स अॅप स्टेटसवर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे कुटुंबात आणि पक्षात फूट पडल्याचे त्यांनी नमूद केले होते. तर कार्यकर्त्यांमधून राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडेच येणार असं चित्रही निर्माण झालं होतं. त्यातच सुप्रिया सुळे शरद पवारांच्या साथीत मैदानात उतरल्या आहेत. यामुळे या चर्चांना बळ मिळात आहे. 

सरकार स्थापन करण्याच्या घडामोडींमध्ये सुप्रिया आघाडीवर दिसल्या. आमदारांच्या शपथविधीच्या दिवशी त्या जातीने गेटवर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित सर्वच पक्षांच्या आमदारांचे स्वागत केले. तर नव्याने निवडून आलेल्या आमदारांची गळाभेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या सोहळ्यातही त्या आघाडीवर दिसत होत्या. या व्यतिरिक्त सुप्रिया सुळे यांची दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरे यांच्या संदर्भातील एक पोस्टही आली होती. 

एकूणच अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व उभं करण्याच्या हालचाली तर सुरू झाल्या नाही ना, अशा चर्चा रंगत आहे. यात किती तथ्य आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019