शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत कुणाची मते घेतली?; समाजवादी पक्षाचा ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:03 IST

आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही कधीही आम्ही हिंदुत्ववादी नाही हे बोललो नाही असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

मुंबई - जेव्हा तुम्ही आघाडीत येता तेव्हा किमान समान कार्यक्रम असतो. भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत जी मते त्यांना मिळाली ती कोणत्या समाजाची आहेत याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी द्यावे. मिलिंद नार्वेकरांनी बाबरी घटनेवरून जे ट्विट केले त्यावर तुमची भूमिका काय हे बोलावे असा निशाणा समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी ठाकरे गटावर साधला आहे. अबु आझमी हे भाजपाची बी टीम आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती त्यावर रईस शेख यांनी उत्तर दिले.

आमदार रईस शेख म्हणाले की, महाविकास आघाडी ही पुरोगामी विचारांवर निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारांना जतन करायचे आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांनी जे ट्विट केले त्यावर आधी खुलासा करावा. ए टीम, बी टीम मला त्यावर भाष्य करायचं नाही. नाना पटोलेंसोबत माझं बोलणं झालं आहे. जी भूमिका मिलिंद नार्वेकरांनी घेतली त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीसह ठाकरेंची भूमिका काय आहे ते महत्त्वाचे आहे असं त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते भाजपाची बी टीम म्हणून काम करतात. अखिलेश यादव त्यांची लढाई लढतात परंतु इथले नेते भाजपाची बी टीम असल्याचं वागतात. हे आम्ही आधीही पाहिलं आहे. या निवडणुकीत मला बोलायचं नाही, त्यांनी कुणाची मदत केली, कशी मदत केली हे माहिती आहे. आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही कधीही आम्ही हिंदुत्ववादी नाही हे बोललो नाही. आमचं हिंदुत्व सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आहे. महाविकास आघाडीतील ए टीम, बी टीम यांनी आम्हाला शिकवू नये. हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई, पारसी बुद्धिस्ट असो सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले आहे आणि यापुढेही करत राहू असं सांगत आदित्य ठाकरे यांनी अबु आझमी यांना टार्गेट केले. 

"...म्हणून मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय"

समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची सर्वधर्म समभावाची भूमिका असल्याने आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीत राहू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार बाबरी मशीद पाडल्याची आमची जखम ओली करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत असं अबु आझमी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Abu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी