शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत कुणाची मते घेतली?; समाजवादी पक्षाचा ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:03 IST

आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही कधीही आम्ही हिंदुत्ववादी नाही हे बोललो नाही असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

मुंबई - जेव्हा तुम्ही आघाडीत येता तेव्हा किमान समान कार्यक्रम असतो. भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत जी मते त्यांना मिळाली ती कोणत्या समाजाची आहेत याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी द्यावे. मिलिंद नार्वेकरांनी बाबरी घटनेवरून जे ट्विट केले त्यावर तुमची भूमिका काय हे बोलावे असा निशाणा समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी ठाकरे गटावर साधला आहे. अबु आझमी हे भाजपाची बी टीम आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती त्यावर रईस शेख यांनी उत्तर दिले.

आमदार रईस शेख म्हणाले की, महाविकास आघाडी ही पुरोगामी विचारांवर निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारांना जतन करायचे आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांनी जे ट्विट केले त्यावर आधी खुलासा करावा. ए टीम, बी टीम मला त्यावर भाष्य करायचं नाही. नाना पटोलेंसोबत माझं बोलणं झालं आहे. जी भूमिका मिलिंद नार्वेकरांनी घेतली त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीसह ठाकरेंची भूमिका काय आहे ते महत्त्वाचे आहे असं त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते भाजपाची बी टीम म्हणून काम करतात. अखिलेश यादव त्यांची लढाई लढतात परंतु इथले नेते भाजपाची बी टीम असल्याचं वागतात. हे आम्ही आधीही पाहिलं आहे. या निवडणुकीत मला बोलायचं नाही, त्यांनी कुणाची मदत केली, कशी मदत केली हे माहिती आहे. आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही कधीही आम्ही हिंदुत्ववादी नाही हे बोललो नाही. आमचं हिंदुत्व सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आहे. महाविकास आघाडीतील ए टीम, बी टीम यांनी आम्हाला शिकवू नये. हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई, पारसी बुद्धिस्ट असो सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले आहे आणि यापुढेही करत राहू असं सांगत आदित्य ठाकरे यांनी अबु आझमी यांना टार्गेट केले. 

"...म्हणून मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय"

समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची सर्वधर्म समभावाची भूमिका असल्याने आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीत राहू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार बाबरी मशीद पाडल्याची आमची जखम ओली करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत असं अबु आझमी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Abu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी