शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत कुणाची मते घेतली?; समाजवादी पक्षाचा ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:03 IST

आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही कधीही आम्ही हिंदुत्ववादी नाही हे बोललो नाही असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

मुंबई - जेव्हा तुम्ही आघाडीत येता तेव्हा किमान समान कार्यक्रम असतो. भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत जी मते त्यांना मिळाली ती कोणत्या समाजाची आहेत याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी द्यावे. मिलिंद नार्वेकरांनी बाबरी घटनेवरून जे ट्विट केले त्यावर तुमची भूमिका काय हे बोलावे असा निशाणा समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी ठाकरे गटावर साधला आहे. अबु आझमी हे भाजपाची बी टीम आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती त्यावर रईस शेख यांनी उत्तर दिले.

आमदार रईस शेख म्हणाले की, महाविकास आघाडी ही पुरोगामी विचारांवर निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारांना जतन करायचे आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांनी जे ट्विट केले त्यावर आधी खुलासा करावा. ए टीम, बी टीम मला त्यावर भाष्य करायचं नाही. नाना पटोलेंसोबत माझं बोलणं झालं आहे. जी भूमिका मिलिंद नार्वेकरांनी घेतली त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीसह ठाकरेंची भूमिका काय आहे ते महत्त्वाचे आहे असं त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते भाजपाची बी टीम म्हणून काम करतात. अखिलेश यादव त्यांची लढाई लढतात परंतु इथले नेते भाजपाची बी टीम असल्याचं वागतात. हे आम्ही आधीही पाहिलं आहे. या निवडणुकीत मला बोलायचं नाही, त्यांनी कुणाची मदत केली, कशी मदत केली हे माहिती आहे. आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही कधीही आम्ही हिंदुत्ववादी नाही हे बोललो नाही. आमचं हिंदुत्व सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आहे. महाविकास आघाडीतील ए टीम, बी टीम यांनी आम्हाला शिकवू नये. हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई, पारसी बुद्धिस्ट असो सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले आहे आणि यापुढेही करत राहू असं सांगत आदित्य ठाकरे यांनी अबु आझमी यांना टार्गेट केले. 

"...म्हणून मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय"

समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची सर्वधर्म समभावाची भूमिका असल्याने आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीत राहू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार बाबरी मशीद पाडल्याची आमची जखम ओली करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत असं अबु आझमी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Abu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी